पोस्ट्स

नाशिकच्या कलाकारांची हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचेल - पाटील. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला सर्विसेस,  संपर्क-7387333801 ______________________________________ नाशिकच्या कलाकारांची हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचेल - पाटील नाशिक ( प्रतिनिधी ) घर, संसार सांभाळून अनेक महिला कलानिर्मितीचा छंद जोपासतात. त्यांनी आपल्या कलेचे मूल्य जाणून घेतले पाहिजे. देसी हाट या संकल्पनेतून नाशिकच्या अनेक कलाकारांची अप्रतिम हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर नक्कीच पोहोचेल.मात्र त्यासाठी मोठी स्वप्ने बघणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गुंतवणूक सल्लागार मंदाकिनी पाटील यांनी केले.     आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने काल ( दि.८) देसी हाट या वर्षभर सुरू रहाणाऱ्या कलाउत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मोजक्या कलाकार व रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कॅनडा कॉर्नरजवळच्या हेरंब रेसीडेन्सीत आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुण्या मंदाकिनी पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. बिना रावत यांच्या हस्ते केक कापून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ओमप्रकाश रावत यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ते म्हणाले, अनेक महिला,पुरुष अंगभूत कलेचा वापर करून सुंदर कलानिर्मिती करतात. त्यांच्या कलाक

सावधान, सावधान ! कोणता नवीन नियम लागू होणार ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सावधान ! परदेशात जायचे आहे ? तर आता ही काळजी घ्यावी लागेल ! कोव्हिड-१९ महामारीतून जग सावरायचे नांव घेत नाही, प्रत्येक देशात मंथनाच्या फैरी झडत आहेत, वेगवेगळ्या नियमावली तयार होत आहेत, आपणही परदेशात नोकरीसाठी, फिरण्यासाठी जाणार असाल तर फक्त पासपोर्ट, वीजा पूर्णतः उपयोगाचा नाही, त्याच्या जोडीला एक नवीन पासपोर्ट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. "कोव्हिड वॅक्सीनेशन पासपोर्ट" नावाचा नवीन पासपोर्ट लागू झाला तर आश्र्चर्य वाटू देऊ नका, युरोपियन देशांनी असा पासपोर्ट सक्तीचा करण्यासाठी तयारी सुरू केली तर ? यासाठी फक्त कोव्हिड लस टोचून घेतली आहे असं समजून घेणं मुर्खपणाचे लक्षण ठरेल, अशा नियमांचा अवलंब एखाद्या देशाने सुरू केला तर आपल्या जवळ कोव्हिड लस टोचून घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे व सोबत बाळगावे लागेल. याची सुरूवात युरोपियन देशांमधून लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत, यासाठी नागरिकांनी तितकेच सतर्क राहायला हवे असे वाटते. आपण भारतीय याबाबत नशीबवान आहात असेच म्हणावे लागेल कारण जगात भारत एकमेव असा देश आहे की एकाच वेळी तीन कंपन्या लस बनवित आहेत व पुरवठाही करत आहेत, आपला पासपोर्ट वीजा

खरंच महिला "अबला" आहेत का  ?  ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करताना हेच अपेक्षित आहे- दिलीप देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेला विशेष लेख !! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
||  खरंच महिला "अबला" आहेत का  ?  || स्त्रियांना अबला संबोधून दुय्यम स्थान दिले जाते. खरच ती अबला आहे का? परवा परवाच महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुका झाल्यात.खूप महिला निवडून आल्यात.खरतर त्यात अनेक सक्षम महिला आहेत.पण सत्तेचे केन्द्र आपल्या  कडेच रहावे ह्या  प्रयत्नात स्त्रियांना बाजूला सारून देता पुरुष मंडळी . आणि स्त्रियांना सबला,सक्षम, करण्याच्या गोष्टी करतात.                   खडकी.ता.दौंड.जि.पुणे.इथे सरपंच म्हणून निवडून आलेली एकवीस वर्षाची तरुणी स्नेहल काळभोर ,हिची प्रतिक्रिया बोलकी आहे.आपल्याकडे सक्षमता आहे.मला महिला आणि सगळ्यां साठी काम करायच आहे.विविध आरोग्य- शिक्षण,योजना आणायच्या आहे.बचत गटाचे काम करायचे आहे.आदर्श गाव निर्माण करायचा आहे.निवडून आलेल्या महिला सदस्यांना मी सांगितले आहे.काम आपल्याला करायचे आहे.कामकाजात,निर्णयात,नातेवाईकांना येण्यास परवानगी  नाही. मार्गदर्शन घेऊ. महिलादिवस साजरा करतांना हेच अपेक्षित आहे.              ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो..वर्षभरात ज्या कोणी महिलांनी, शिक्षण,कला,क्र

अकरा शतकांच्या परंपरेचे समृध्द, सर्जक प्रतिनिधित्व ! रिनाचे योगदान बघता तिची शिफारस पुढील वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारासाठी होणे उचित ठरेल ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अकरा शतकांच्या परंपरेचे समृध्द, सर्जक प्रतिनिधित्व !      आदिवासी वारली जमातीच्या लोकजीवनाचे, संस्कृतीचे व धार्मिक चालीरीतींचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रशैलीत उमटलेले दिसते.११०० वर्षांची ही परंपरा मुख्यत्वे महिलांनीच जोपासली, वृद्धिंगत केली. सुमारे ५० वर्षांपूर्वी दुर्गम पाड्यांवरचे हे कलावैभव शहरी रसिकांसमोर आले. एकेकाळी महिलांची मक्तेदारी असणाऱ्या या कलेत सध्या पुरुषी वर्चस्व निर्माण झालेले जाणवते. आता मोजक्याच महिला वारली चित्रे रंगवताना दिसतात. हा सांस्कृतिक वारसा हिरीरीने पुढे नेणारी रीना उंबरसाडा - वळवी ही अकरा शतकांच्या परंपरेचे समृद्ध, सर्जक प्रतिनिधित्व करते. तब्बल चार वेळा ती फ्रान्सला जाऊन आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तिचा हा अनोखा कलाप्रवास...     छोट्या रीनाची आई जमनीबाई लग्नप्रसंगी वधूवरांच्या झोपडीच्या भिंतीवर लगनचौक लिहायची. हे रेखाटन उत्सुकतेने बघणारी रीना या कलेचा उपजत वारसा लाभल्यामुळे त्यात रमायची. शाळेत असताना हौसेने शुभेच्छापत्रांवर वारली चित्रे रेखाटायची. त्याचे कौतुक व्हायचे. पुढे दहावी उत्तीर्ण झाल्यावर व्यवसायाने वकील असणाऱ्या असूंता पारधी यांन

निसर्गाचं गाणं, लोकसंस्कृतीचं लेणं ! निसर्ग व लोकसंस्कृतीप्रेमींसाठी खास लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
निसर्गाचं गाणं ; लोकसंस्कृतीचं लेणं !    दुर्गम भागात वस्ती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक जमाती भारतात आहेत. त्यांना मूलवासी किंवा आदिवासी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, नंदुरबार, तसेच विदर्भातील काही भाग आदिवासी बहुल आहे. शेजारच्या डांग भागातही आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यात प्रामुख्याने वारली, कोकणा, कातकरी, गोंड, कोरकू, भिल्ल या जमातींचा समावेश होतो. त्यांच्या जीवनशैलीवर जसा निसर्गाचा प्रभाव आहे, तसाच तो त्यांची लोकगीते, लोककथांवरही आहे. सूर्यचंद्र, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, झाडंझुडपं, सभोवतालचा परिसर यांचं वर्णन आणि गुणगान त्यात आढळतं. ते त्यांच्या लोकसंस्कृतीचंच कलारूप आविष्करण आहे. वारली चित्रशैलीत तर ते अधिक नितळपणे प्रतिबिंबित होतं. सध्या वसंत ऋतूत जणू सारी सृष्टीचं गाणं गात असते.     ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या वारली चित्रशैलीला बऱ्याचदा लोककथांंचा  आधार असतो. लोकगीतांमधील लय, ताल व विचार चित्रांमध्ये प्रकट होतो. लोकसंस्कृतीची रसरशीत भावानुभूती त्यातून मिळते.आदिवासी वारली जमातीतील कलाकार, विशेषतः स्त्रिया आपल्या झोपडीच्या भिंती चित्रांनी सजवतात.

एक मार्च रोजी राबविली जाणार जंत विरोधी मोहीम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जंता पासून मुक्त , होतील मुले सशक्त ! एक मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात राबविली जाणार जंत विरोधी मोहीम ! नाशिक::- जिल्ह्यामध्ये येत्या १ ते ८ मार्च सप्ताहात १ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना जंतविरोधी गोळी दिली जाणार आहे, भारतात ५ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते, महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणा  मुळे वाढ खुंटलेल्या  बालकांची टक्केवारी एन एफ एच एस ३ सर्वेनुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलीं मध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो तसेच  महाराष्ट्रात मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीचे प्रमाण २९ टक्के आढळलेले आहे त्यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिन ही आरोग्य विभागामार्फत दरवर्षी दोनदा वर्षातून राबविण्यात येते, यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मोहिमेची आखणी केलेली आहे दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सम

सावरकरांची अनेक वैशिष्ट्ये अपरिचित  - प्रा. डॉ. गिरीश पिंपळे . सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सावरकरांची अनेक वैशिष्ट्ये अपरिचित  - प्रा. डॉ. गिरीश पिंपळे   नाशिक ( प्रतिनिधी )- सावरकरांचे नाव उच्चारले की आपल्याला अंदमानमध्ये त्यांनी सहन केलेल्या छळाची, त्यांच्या कवितांची , त्यांनी समुद्रात मारलेल्या उडीची किंवा माझी जन्मठेप या ग्रंथाची आठवण होते. पण त्यांचे व्यक्तिमत्व इतके मर्यादित नाही. त्यांची अनेक वैशिष्ट्ये समाजापुढे ठळकपणे आलेली नाहीत , ती अपरिचित राहिली आहेत असे प्रतिपादन नाशिक येथील सावरकर अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी नुकतेच केले.      सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त समर्थ भारत मंचाने आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात प्रा. डॉ. गिरीश पिंपळे ‘अपरिचित सावरकर’ या विषयावर  बोलत होते. विशेष म्हणजे समर्थ भारत मंच ही दृष्टीबाधित बांधवांनी स्थापन केलेली राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. आपण राष्ट्राचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संस्था काम करीत आहे. सुरवातीला मंचाचे प्रमुख कार्यकर्ते  संदेश नारायणे यांनी सर्वांचे स्वागत केले.  पिंपळे यांनी सावरकरांच्या एकूण पाच अपरिचित पैलूंचा आपल्या भाषणात अतिशय प्रभावीपणे वेध घेतला. सावरकर हे द्रष्टे, भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते, विज्ञ

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नियोजित साहित्य संमेलन पुढे ढकलले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर इगतपुरी तील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन पुढे ढकलले ! नासिक, वाडीवऱ्हे::- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे.         कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात हे २२वे ग्रामीण साहित्य संमेलन दि.२६ आणि २७ फेब्रु.रोजी होणार होते,साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांची निवड करण्यात आली होती.आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर साहित्य संमेलनाचे आयोजन याच प्रमुख पाहुन्यांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती त्यांनी दिली.        राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमावर बंधने घालून नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते,या अवाहनास प्रतिसाद देत संयोजकांनी हा साहित्य संमेलन पुढे ढकलन्याचा निर्णय बैठकी

रेषांमधला आनंददायी 'मुक्तछंद' ! मार्केट विस्तारले ! सौन्दर्य हरवू नये ! संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
रेषांमधला आनंददायी 'मुक्तछंद'    आदिवासी वारली जमात दुर्गम पाड्यांवर पूर्वापार राहते. निसर्गाशी एकरूप होऊन पर्यावरण रक्षण करणारे स्त्रीपुरुष मुक्तपणे जगतात. स्वच्छंदी, स्वतंत्र जीवनाची त्यांना उपजतच आवड आहे. पोटापाण्यासाठी शेती करणे, दिवसभर रानावनात मनसोक्तपणे भटकंती करणे, मासे पकडणे असे मनमोकळे जगायला त्यांना आवडते.सण- उत्सव, विविध देवदेवतांचे पूजाविधी, लग्नसोहळे,सामूहिक नृत्य यात ते मनापासून रममाण होतात. याच स्वच्छंदी जीवनाचे प्रसन्न, आनंदी प्रतिबिंब त्यांच्या वारली चित्रशैलीत स्पष्टपणे उमटलेले दिसते.रेषांमधला हा आनंददायी ' मुक्तछंद ' वारली चित्रांमध्ये सहजपणे अनुभवता येतो.     आदिवासी वारली जमात ठाणे जिल्ह्यातील पाड्यांपासून गुजरातच्या सीमारेषेपर्यन्त पसरलेली आहे. ठाणे जिल्ह्यात १० वन्य जमाती असून त्यात वारली बहुसंख्येने राहतात. डहाणू, पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी, सिल्वासा, दीव - दमण, दादरा - नगरहवेली या भागात तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, नंदुरबार जिल्ह्यात व डांग परिसरात वारल्यांची वस्ती आहे. वारली चित्रशैलीला तब्बल ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा अस

बी. आर. फ्रेंड सर्कल तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ उत्साहात साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
बी. आर. फ्रेंड सर्कल तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ म्हसरुळ येथे उत्साहात साजरा       नासिक::- म्हसरूळ येथील बी. आर. फ्रेंड सर्कल च्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला संगीत लाईट शो आयोजीत करण्यात आला होता. शिवजयंती व लाईट शो पाहण्यासाठी परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन भावनेश राऊत , अध्यक्ष राकेश पाटील , अजय मोरे , अजय पाटील , तन्मय नेरकर , राजेश जाधव , ऋषी ढवळे , मयूर पाटील , तन्मय कड, प्रितेश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.