पोस्ट्स

पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द ! माझा कार प्रवास !!

इमेज
पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द !                 (पुस्तक परीक्षण)    पर्यटनाचे महत्त्व समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात देखील सांगितले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटनाचा चांगला उपयोग होतो. देशाच्या विविध भागातील संस्कृती, इतिहास, निसर्ग सौंदर्य, तेथील जीवनशैली, खाद्यविशेष यांची पर्यटनामुळेच ओळख होते. पर्यटन केवळ मौजमजा, विरंगुळा, मनोरंजन इतक्यापुरतेच मर्यादित नाही. आपल्या भारतात विविधतेतली एकता बघायला मिळते. गड-कोट, मंदिरे, लेणी, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते. साहसी पर्यटन देखील केले जाते. आपल्या आनंदासाठी कारने प्रवास करणाऱ्या पर्यटकांना ' माझा कार प्रवास ' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.     अमरावतीचे विजय पाटणे पर्यटनप्रेमी आहेत. त्यांनी कारमधून प्रवास करून महाराष्ट्रासह बव्हंशी सारा देश पिंजून काढला. शेजारच्या नेपाळलाही ते कारने प्रवास करूनच भेट देऊन आले. 'माझा कार प्रवास' या पुस्तकामधले या सर्व भटकंतीचे वर्णन वाचताना वाचकांना नक्कीच प्रवासाची अनुभूती मिळेल. 'बीएसएनएल'मध्ये उपविभागीय अभियंता पदावरू

राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण ! या दोन ग्रामपंचायतींचा होणार गौरव !

इमेज
राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण !     पंचायती राज दिनी ग्रामसभांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेबिनारद्वारे करणार मार्गदर्शन !           नाशिक जिल्ह्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती मोडाळे ता.इगतपुरी व  दरी ता. नाशिक यांचा होणार गौरव बक्षिसाची रक्कम PFMS द्वारे थेट ग्रामपंचायतींना होणार वितरित.          नाशिक - २४ एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजन करण्यात येणार असून राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री देशातील सर्व नागरिकांना वेबिनारद्वारे संबोधित करणार आहेत. या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था व ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.       देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पंचायती राज दिवस कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीस ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आवश्यक असल्याने खालील वेब लिंक नोंदणी करावी आणि २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२:०० वा. नियोजित राष्ट्र

कामकाजात अनियमितता व दोषारोप सिद्ध झाल्याने दोन ग्रामसेवकांचे निलंबन !

इमेज
कामकाजात अनियमितता : दोन ग्रामसेवक निलंबित ! दोषारोप सिद्ध झाल्याने केले निलंबन ! नाशिक - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती लीना बनसोड यांनी ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर येथील ग्रामसेवक पांडुरंग जाणु खरपडे यांना १० दोषारोपावरुन व ग्रामपंचायत कोमलवाडी, ता. सिन्नर येथील ग्रामसेवक राजेंद्र भाऊराव निकम यांना ०३ दोषारोपावरुन निलंबित केले आहे.           पांडुरंग जाणु खरपडे हे ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असुन त्यांच्याविरुध्द कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार आर. आर. बोडके प्रशासक यांनी दिनांक ३ नोव्हेंबर २१ व १२ जानेवारी २२ रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, ग्रामस्थांना पाणी न मिळणे, कोटंबी हे गांव आदिवासी क्षेत्रात येत असुन पेसा व इतर आदिवासी योजनांपासुन गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुध्दीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करुन न देणे, गावांत ३

शाश्वत विकासाचा संकल्प,. गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ !

इमेज
ग्रामपंचायतींकडून शाश्वत विकासाचा संकल्प पंचायत राज दिनी ग्रामसभेत होणार ठराव : गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ नाशिक : गरिबीचे उच्चाटन करणे, पृथ्वीच्या रक्षण करणे आणि २०३० पर्यंत सर्व नागरिकांना शांतता व समृध्दी प्राप्त करून देणे, यासाठी पंचायत राज संस्था कटिबध्द असून येत्या  २४ एप्रिल २०२२ रोजी प्रत्येक ग्रामपंचायत शाश्वत विकासाचा संकल्प सोडणार आहे, तसेच केंद्र सरकारच्या व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड वर याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत केंद्र शासनाने नव्याने सुधारणा केली आहे त्यानुसार सन २०२२-२३ पासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाने जी ध्येये निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या १७ पैकी ९ संकल्पना / विषय (Themes) केंद्र शासनाने निश्चित केल्या आहेत. *******************************         या संकल्पना खालील प्रमाणे : 

अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. च्या अध्यक्षपदी निवड !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा,.                                     डॉ. अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी विभागातील सुप्रसिद्ध डॉ. अनिल आव्हाड यांची इंडियन मेडिकल असोसिएशन, मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ मुंबई हाजीअली येथील "आय एम ए हाऊस" येथे संपन्न झाला. आय एम ए दिल्लीचे सेक्रेटरी जनरल डॉ. जयेश लेले हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आय एम ए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल आव्हाड यांनी त्यांच्या पुढील वर्षातील योजनांबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यावसायिकांची जनमानसातील प्रतिमा उंचावणे, डॉक्टरांचे वैयक्तिक आरोग्य व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य यांचे महत्त्व ओळखून ते उत्तम राखण्यासाठी नवीन योजना आखणे, डॉक्टरांच्या मनावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करणे; ज्यामध्ये वेगवेगळे खेळ, संगीत आणि पर्यटन याचा समावेश असेल असे विविध कार्यक्रम राबविण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?" (१२ एप्रिल)वजनदार हास्यकवी अर्थातकविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !

इमेज
माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?"    (१२ एप्रिल) वजनदार हास्यकवी अर्थात कविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !                                                     १२ एप्रिल, आपल्या विनोदी काव्यरचनांनी रसिकांना रिझविणारे हिंदी हास्यकवी प्रदीप चौबे यांचा तिसरा स्मृतिदिन. तीन वर्षापूर्वी १२ एप्रिलला चौबे यांचे दिर्घ आजाराने वयाच्या ७१ व्या वर्षी ग्वालियर येथे निधन झाले होते. २६ ऑगस्ट १९४९ ला महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे जन्मलेल्या आणि नंतर ग्वालियर येथे वास्तव्यास असलेले प्रदीप चौबे अखिल भारतीय हिंदी कविसंमेलनाचे बेताज बादशहा होते. व्यंगकार, कवि आणि गीतकार प्रदीप चौबे  आपल्या हास्य कवितांना नेहमीच टीकात्मकतेची जोड देऊन तत्कालीन परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करायचे. हिंदी हास्य कविसंमेलनांचा फड गाजवणारे कवी प्रदीप चौबेंना चाहत्यांचे अलोट प्रेम लाभले होते. ते काव्य मैफिलीत नेहमीच हास्याची कारंजी उडवत असत. त्यांच्याशिवाय कोणतेह

जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल

इमेज
जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल.          नवी दिल्ली::- जलजीवन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण घरांमध्ये  ७०% नळाद्वारे पाणी पोहचविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील एकूण १४६.०९ लाख घरांपैकी १०३.५४ लाख म्हणजे ७०.८८% घरांमध्ये  ०४ एप्रिल २०२२ रोजीपर्यंत नळाच्या पाण्याची जोडणी  पोहोचली आहे. जल जीवन अभियान  २०१९ घोषित झाले तेव्हा महाराष्ट्रातील केवळ ४८.४४ लाख म्हणजे ३३ टक्के ग्रामीण घरात नळाच्या पाण्याच्या जोडण्या होत्या. त्यानंतर पाण्यासाठीच्या नळजोडणीत  ५५.१० लाख म्हणजे ३७.७२ टक्के घरांची भर पडली. अशी माहिती जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. ******************************* जलजीवन अभियान- महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत नळाचे पाणी पोचवण्यासाठी केंद्र सरकार ऑगस्ट २०१९ पासून ‘जलजीवन अभियान- हर घर जल’ राज्यांसोबतच्या भागीदारीतून राबवत  आहे. ********************************* नासिक जिल्ह्यात "जलजीवन अभियान-हर घर जल&