जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल

जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल.

         नवी दिल्ली::- जलजीवन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण घरांमध्ये  ७०% नळाद्वारे पाणी पोहचविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील एकूण १४६.०९ लाख घरांपैकी १०३.५४ लाख म्हणजे ७०.८८% घरांमध्ये  ०४ एप्रिल २०२२ रोजीपर्यंत नळाच्या पाण्याची जोडणी  पोहोचली आहे.

जल जीवन अभियान  २०१९ घोषित झाले तेव्हा महाराष्ट्रातील केवळ ४८.४४ लाख म्हणजे ३३ टक्के ग्रामीण घरात नळाच्या पाण्याच्या जोडण्या होत्या. त्यानंतर पाण्यासाठीच्या नळजोडणीत  ५५.१० लाख म्हणजे ३७.७२ टक्के घरांची भर पडली. अशी माहिती जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
*******************************
जलजीवन अभियान-
महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत नळाचे पाणी पोचवण्यासाठी केंद्र सरकार ऑगस्ट २०१९ पासून ‘जलजीवन अभियान- हर घर जल’ राज्यांसोबतच्या भागीदारीतून राबवत  आहे.
*********************************
नासिक जिल्ह्यात "जलजीवन अभियान-हर घर जल" अंतर्गत  ८७% नळाच्या पाण्याची जोडणी झाली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून देण्यात आली.
********************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास.". निशा डांगे यांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मविश्वास बाबत सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!