जळजळीत टीका ! उद्धवराव, नाकर्त्या कारभाराबद्दल आधी महाराष्ट्राची माफी मागा - गिरीष पालवे
जळजळीत टीका ! उद्धवराव, नाकर्त्या कारभाराबद्दल आधी महाराष्ट्राची माफी मागा - गिरीष पालवे नाशिक - भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीष पालवे यांची जळजळीत टीका ! कोविड महामारीच्या काळात देशात सर्वात जास्त कोविड मृत्यू महाराष्ट्रात झाले. ठाकरे सरकारच्या वसुलीबाज कारभाराला कंटाळून अनेक उद्योग राज्याबाहेर गेले. सरकारी अनागोंदीमुळे महाराष्ट्र रसातळाला गेला तरी अजूनही उद्धव ठाकरे आपल्या नाकर्त्या कारभाराबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. आपल्या नाकर्त्या, भ्रष्ट कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागा आणि सत्ता असतानाही घरी बसलात तसे घरीच बसा, अशी जळजळीत टीका भाजपा चे गिरीष पालवे यांनी केली आहे. स्वतःवर स्तुतिसुमने उधळण्याच्या या आत्मकेंद्री स्वभावामुळेच आज ठाकरे यांनी पक्ष, चिन्ह, निष्ठावंत कार्यकर्ते गमावले आहेत, असेही गिरीष पालवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पाचोरा ( जि. जळगाव ) येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाषणाची जुनी टेप वाजविली. पंचवीस वर्षे राजकारणात असूनदेखील आजही स्वतःचे स्थान किंवा कर्तृत्व दाखविता न आल्याने दिवंगत पित्याच्या पुण्याईवर लोका