शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !
शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा ! नाशिक::- सातपूर च्या अशोकनगर भागातील गट क्र. ४९२ व ४९३ संदर्भातील कथित जमीन हडप प्रकरणात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार सुनिता प्रभाकर दोंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी महसूल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तसेच यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले. जितेंद्र मनोहरदास ठक्कर, शामसुंदर रामकिसन लाहोटी, लिलाबाई शामसुंदर लाहोटी, सोनल कपिल लाहोटी, कपिल शामसुंदर लाहोटी व इतर अनोळखी व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन १९८० मध्ये फेरफार नोंद क्रमांक २९३५ व २९३६ द्वारे महसूल अभिलेख ७/१२ मध्ये बेकायदेशीररीत्या नावे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा