पोस्ट्स

नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत, खते, कीटकनाशकांचे अंश अन्नधान्यात आढळून येत आहेत. या अन्नधान्यामुळे मानवी प्रतिकार क्षमता कमी होऊन दुर्धर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. जमिनीची जलसंधारणाची क्षमताही कमी झाली आहे.

इमेज
नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत सह्याद्री फार्म येथे शेतकरी, कृषी सखींसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधला संवाद           नाशिक : रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अती वापराने देशातील सुपीक जमीन नापीक केली आहे. नापीक जमीन सुपीक बनवून  आत्मनिर्भर भारत करण्यासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.            दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवादात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,  पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,  विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.            राज्यपाल म्हणून नव्हे, तर श...

जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

इमेज
जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई नाशिक : जिल्हा परिषद नाशिकमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card) पडताळणी मोहिमेला गती देण्यात आली असून बोगस, अपूर्ण अथवा नियमबाह्य दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सवलती घेतल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी कठोर भूमिका घेत कारवाई सुरू ठेवली आहे. या मोहिमेंतर्गत आज आणखी १ मुख्याध्यापक व ४ शिक्षक अशा एकूण ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बागलाण तालुक्यातील १ मुख्याध्यापक तसेच इगतपुरी, मालेगाव, सिन्नर व सुरगाणा तालुक्यातील प्रत्येकी १ शिक्षकाचा समावेश आहे.            पडताळणी प्रक्रियेदरम्यान दोन शिक्षकांनी अद्याप UDID प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले. तसेच एका मुख्याध्यापक व एका शिक्षकाने UDID प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर नवीन UDID प्रमाणपत्र सादर न केल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय ...

परळी-वैजनाथ येथील राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग !

इमेज
परळी-वैजनाथ येथील राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग !         पुणे::- बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव मा. डॉ. रामास्वामी एन. यांनी परळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन नियोजित प्रदर्शनाच्या जागेची पाहणी केली आणि तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रदर्शनाचे नियोजन उत्कृष्ट दर्जाचे असावे, अशा सूचना देत आवश्यक मार्गदर्शन केले. पाहणी दरम्यान डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रदर्शनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची उपयुक्तता, पशुपक्ष्यांच्या राहण्याची सोय, येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या सुविधा आणि प्रदर्शनाचे तांत्रिक नियोजन यावर सविस्तर चर्चा केली.  हे प्रदर्शन राष्ट्रीय स्तरावरचे असल्याने यामध्ये विविध राज्यांतील उत्कृष्ट पशू आणि पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील. बीड जिल्ह्यासह संपूर्ण म...

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

इमेज
राडा’ इव्हेंट: नाशिकमध्ये खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम युवांमध्ये उतुंग उत्साह! नाशिक ::-  नोव्हेंबरला नाशिकमध्ये आयोजित झालेल्या ‘राडा’ इव्हेंटने शहरातील खेळ व प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक नवीन अध्याय घडवला. Metamorph MMA आणि Merakii Events and Gifting यांच्या संयुक्त विद्यमाने २४/७ फिटनेस जिम, बोधलेनगर, नाशिक येथे आयोजित या बहुउद्देशीय कार्यक्रमात १०० हून अधिक स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. यामुळे प्रेक्षक आणि क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाची नवचेतना निर्माण झाली.             आजच्या काळात देशातील युवा—विशेषतः लहान मुले—मोबाइल फोन आणि ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत असल्याने त्यांच्या शारीरिक खेळांकडे असलेल्या ओढीत घट होत आहे. अशा परिस्थितीत, ‘राडा’ सारख्या रोमांचक क्रीडा स्पर्धांनी युवांमध्ये नवऊर्जा आणि जोश निर्माण केला. हा कार्यक्रम केवळ स्पर्धा न ठरता, तरुणांना आभासी जगातून बाहेर पडून घाम गाळण्यास, स्वतःमधील प्रतिभेला उजाळा देण्यास आणि तिला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास प्रेरक ठरला.       ...

नासिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन ! नवीन इमारत कशी असेल याची चित्रफीत !

इमेज
नासिक::- जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी दि.१३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांना निमंत्रणे देण्यात येत आहेत. 

कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर

इमेज
कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर     नाशिक : युवकांचा शेतीतील सहभाग या विषयाला अनुसरून 'ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन' व  मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि' यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९८ पासून ‘कृषीथॉन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाच्या १८ व्या आवृत्तीचे आयोजन दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात येत आहे.  युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी संशोधन या क्षेत्रात केलेल्या विशेष वाटचालीची दखल घेऊन ‘प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार’ देऊन सन्मानित करणार आहोत. प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारासाठी डॉ. अरुण दत्तात्रय भगत {पुणे}, कानिफनाथ अण्णासाहेब बुरगुटे {उपले दुमाला, सोलापूर}, डॉ. सुचिता संजय भोसले {सातारा}, मुजम्मिल बेपारी {कोल्हापूर}, डॉ. श्रीधर निवास बन्ने {तासगाव, सांगली}, डॉ. वैभवकुमार भगवानराव शिंदे {अकोला}, अभिषेक दिनकर दातीर {गणोरे, अहिल्यानगर}, डॉ. अमोल सुखदेव घाडगे {मुरडपु, बुलढाणा}, डॉ. महेश अप्पासाहेब आजबे {गांधेली, छत्रपती संभाजीवनगर }, श...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

इमेज
नाशिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान दिल्ली : दि. १७ ऑक्टोबर रोजी ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्ह्याला गौरविण्यात आले. हा सन्मान मा. महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आला.            आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले असून, या सामूहिक प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.           जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा सन्मान स्वीकारला यावेळी प्रकल्प अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, प्रकल्प अधिकारी (कळवण) ए. के. नरेश, सहायक प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन नाईक आणि जिल्हा व्यवस्थापक (पेसा) राकेश वाघ उपस्थित होते.   ...

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

इमेज
आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’         मुंबई : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी २० लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटूंबीयांना आर्थिक आधार मिळाला. तसेच देवांशीच्या आईने तिला यकृत दिल्यानंतर भाग देवून तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.                        वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु) येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरूवातीला मंगरूळपीर आणि अक...

,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत !

इमेज
"माझा अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत बायको किंवा मेव्हणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले खाजगी सचिव अडचणीत आणतात - "दिलखुलास" नितीन गडकरी (२६ मार्च २०२२) ,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत ! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नावाजलेले राजकीय पदाधिकारी यांना काहीही सोयरसुतक नसल्यासारखे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र निवडणुकांपूर्वी सर्वात मोठा सण दिपवाळीचा जवळच आलेला असताना विविध माध्यमांतून प्रसिद्धी करण्याची संधी दवडली जात आहे.  यांत सर्वच राजकारण्यांची मनोवृत्ती अशी असेलच यात दुमत असू शकते, काही याबाबत खूप जागरूकतेने कार्य करणारेही आहेत. सर्वच नव्हे पण त्यांचे चेले चपाटे ही काही कमी नाहीत, या "किटल्या" कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी आस्थापना, मोठमोठ्या खाजगी आस्थापना यांच्या कार्यालयात "खेट्या" का मारतात हा आता संशोधनाचा विषय उरलेला नाही, जे चालले आहे त्यातून सारं काही जनताजनार्धन उघड्या डोळ्यांनी पहात आहे. या "किटल्यांचा" प्रशास...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला !

इमेज
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला ! नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन आधुनिक इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली. या परिषदेस महाराष्ट्र व गोवा वकील परिषद सदस्य ॲड. जयंत जायभावे, नाशिक जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे, सहसचिव ॲड.संजय गिते, ॲड.सोनाल गायकर, खजिनदार ॲड.कमलेश पाळेकर आदी उपस्थित होते.  नाशिक जिल्हा न्यायालयाची स्थापना सन १८८५ मध्ये झाली. जुन्या दगडी इमारतीनंतर सन २००५ मध्ये न्यायालयासाठी नवीन इमारत उभारण्यात आली होती. मात्र खटले, वकील व न्यायाधीशांची संख्या वाढल्याने न्यायालयाच्या विस्ताराची आवश्यकता भासली. वकील संघाच्या पाठपुराव्य...