आदीवासी विकास महामंडळाच्या कारभाराविरोधात ६ एप्रिल पासुन आमरण उपोषण !

नासिक::-आदिवासी विकास महामंडळाचा कारभार  गेल्या दोन वर्षा पासून अतिशय धिम्या गतीने चालू असून संचालक मंडळाच्या सुचना व ठरावांची अंमलबजावणी होत नाही या विभागातले अधिकारी कोणाला जुमानत नसल्या मुळे आदिवासी योजना ठप्प होत आहेत. शासनाकडून आलेला निधी योजनावर खर्च होत नाही तो शासनास परत जात आहे.
महामंडळाची पंप व पाईप योजनेचा खर्चीत निधी 43 कोटी खर्च न करता शासनाला परत केल्याप्रकरणी संचालक मंडळाला अंधारात ठेवले गेले.खावटी कर्ज वाटप योजनेचे 70 कोटी रूपये परत केल्या प्रकरणी दोशींवर कारवाई व्हावी.या करता व अशा अनेक मागण्यांकरता आदिवासी विकास भवनासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली या वेळी आदीवासी विकास महामंडळाचे भरतसिंग दुधनाग, धनराज महाले,मिनाक्षीताई वट्टी,अशोक मंगाम, मधुकर काठे,विठ्ठल देशमुख,केवलराम काळे,देविदास पाटिल, भगवानदादा वळवी, आदी उपस्तीत होते.
सौजन्य नासिक लोकल, नासिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।