ट्रोल कशावर केव्हा करायचा ? कुणावर करायचा ? आपली लायकी किती ? सात रूपयांत एक रोटी मिळत नाही तुमच्याकडे !! भारतीय मिडिया व सर्वधर्म समभाव नीतीने चालणारी जनता आजही सभ्यता टिकवून आहे !!! ट्रोल करणाऱ्याला त्याच्याच भाषेत मात्र सभ्यतेत दिलेले उत्तर सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
भारतीय मिडिया ने व भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत जी वाटचाल सुरू ठेवली आहे ती जगाला भुरळ घालणारी ठरत असताना शेजारील देशातील राजकारण्यांनी सडकछाप प्रतिक्रिया नोंदवली तीचे पडसाद "पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी" बघायला मिळत आहे. भारताची चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात पोहचली असताना विक्रम लॅंडर चा बंगळुरूस्थित इस्त्रोच्या लॅबशी संपर्क तुटला मात्र विक्रमला वेगळं करणारे आर्बिटर व्यवस्थित कार्यरत आहे. थोडक्यात भारताची चांद्रयान मोहीम खूप किंवा पूर्णतः अपयशी ठरलेली नाही. यापूर्वी सन २००८ मधील चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली होती, तीचा उद्देश सफल झाल्यानंतर चंद्रावरील पाणी व इतर माहिती मिळविण्याचे पुढचे पाऊल म्हणून या मोहीमेकडे पाहीले जाते. शेजारील देश पाकीस्थान आपल्या अकलेचे तारे तोडत आहे, यांत प्रामुख्याने पाकीस्थानचे विज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी आघाडीवर आहेत, ९०० कोटी रुपये खर्च करायची भारताला काय आवश्यकता होती, विरोधी पक्षांनी यांचा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला पाहिजे, त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा "मोलाचा" सल्लाही ट्विटरद्वारे