राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य
राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी, कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. यानिमित्ताने हा लेख… २५ जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत २५ जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे. तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी २५ जानेवारी २०११ पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. २०२६ हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे १६ वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य 'माझा भारत माझे मत ' हे ठेवले आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश ...




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा