पोस्ट्स

आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! ञ्यंबकेश्वर::-तालुक्यातील वाढोली येथील आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने गळक्या छतातून जलधारा  येत असल्याने उपकेंद्रात पाणी साचले आहे, यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन ही उपकेंद्राला दुरूस्ती निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे. वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने त्यावेळी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत असून उपकेंद्र सोय नसुन खोळंबा झाला आहे.त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रूग्नांना उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी,खोकला,ताप यांचे रूग्ण आहेत. त्यांना खाजगी दवाखान्याचा उपचार घ्यावा लागत असल्याने लाखो रुपयांचे उपकेंद्र बिनकामाची वास्तू होऊ पाहते आहे.  उपकेंद्र  दुरुस्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी यांच्याकडून  वारंवार करण्यात आ

न्यूज मसाला एक्सक्ल्युझिव्ह! आज नवनिर्वाचित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी "त्या" रस्त्याची माहिती घेणार ! १ आॅगस्ट रोजी केला जातेगांवचा दौरा !! प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना जनसंपर्काच्या माध्यमातून पोहचविली जाणार- एस. भुवनेश्वरी,मुकाअ,जिप. !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक ::- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी १ आॅगस्ट रोजी जातेगांव चा दौरा करून आपल्या कार्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात केली. सध्या कार्यालयीन कामकाजास व फाईलींचा स्वअभ्यासाबरोबरच निपटारा करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे, लवकरच जिल्ह्यातील पंचायत समित्या व गावांना भेटी देण्याचे व तेथील अडचणी समजून घेत दूर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे न्यूज मसालाशी बोलताना सदर माहिती दिली.                 प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना मिळावी,  यांसाठी जनसंपर्काच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.            जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर व जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा या रस्त्याच्या चौकशी ची मागणी केली आहे, सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने की जिल्हा परिषदेने तयार केला आहे ? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कोण ?, बील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे की जिल्हा पर

गोदावरी नदी व उपनद्या प्रदुषणमुक्त करणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभापती उध्दव निमसे यांनी घेतलेल्या भेटीत दिले नीधी मागणीचे निवेदन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
          प्रतिनीधी ::-भारतातील पवित्र गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील पवित्र गोदावरी नदी व उपनद्या या प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच नाशिक शहरातील विकास योजना आराखड्यातील डीपी रस्ते पूल व तद्अनुषंगिक मुख्य रस्ते विकसित करणेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार , माजी मंत्री बबन घोलप , जगदीश गोडसे, सचिन हांडगे  यांनी निवेदन दिले, या योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबाबत मागणी करण्यात आली.          नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अंसित्त्वातील मलनि:सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी  राष्ट्रिय नदी संवर्धन योजने अंतर्गत रु. ३२२ कोटींच्या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विकास योजना आराखडयातील डी.पी. रस्ते, पुल व                         तद्नुषंगीक मुख्य रस्ते विकसित करणेच्या कामांसाठी निधी प्राप्त व्हावा व त्यातून शहर विकासाला चालना मिळू शकेल असे निवेदन यावेळी नाशिक मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी केले.     

खासदार डॉ भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
खासदार डॉ.भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट !     प्रति निधी::-  दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी दि.१ ऑगस्ट रोजी निफाड येथे ड्रायपोर्ट व्हावे या करीता केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट, पोर्ट मंत्री मनसुख मांडवीय यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. भेटी प्रसंगी निफाड येथे ड्रायपोर्ट उभारणी बाबत चर्चा करत असताना ड्रायपोर्ट कसे व्यवहार्य आहे हे खा.डॉ.भारती पवार या पटवून देत शेतकरी हा कृषी व्यवस्थेचा कणा आहे आणि या ड्रायपोर्टमुळे ग्रामीण भागासह शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास अधिक मदत होईल. या संदर्भात अधिक सकारात्मक चर्चा करत मंत्री महोदयांनी आपण देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. सदर भेटी प्रसंगी सुरेश बाबा पाटील, केदा आहेर, आ.अनिल कदम, व्यवस्थापकीय संचालक खरे आदी उपस्थित होते.

व्हर्च्युअल क्लासरुमची जिल्हयाने यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला !! असा कोणता जिल्हा व कोण जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक   –  आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण् शिक्षण उपलबध करुन देण्यासाठी  व्हर्च्युअल क्लासरुम महत्वाच्या आहेत. यासाठी नाशिक जिल्हा परिषदेमार्फत प्रायोगिक तत्वावर सामाजिक बांधिलकी (सीएसआर) या उपक्रमातून उपलब्ध होणा-या निधीतून व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना जिल्हा परिषदेच्या 100 शाळांमध्ये राबविण्यात येणार असून आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले.              व्हर्च्युअल क्लासरुमबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, युवानेते उदय सांगळे यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून याबाबत माहिती देवून या उपक्रमाचे संगणकीय सादरीकरण केले. पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच नाशिक जिल्हयाने याची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखवला. शहर व गाव यांच्यात

आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि ३० जुलै रोजी वितरण होणार...! शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि.३० जुलै रोजी वितरण होणार...!   प्रतिनिधी::-  विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण व नाविन्यपूर्ण माहिती देणारे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील व सामाजिक भावना जपणाऱ्या नासिक जिल्ह्यातील विविध क्लासच्या संचालकांना यावेळी आदर्श शिक्षक सानेगुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे व दीपस्तंभ फाउंडेशन चे चेअरमन युजवेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प. सा. नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुरेश पवार यांच्या "बे दुने चार"  या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन या विषयावर उत्तम कांबळे यांचं विशेष व्याख्यान तसेच "शिक्षक कधीच  सामान्य नसतो" या विषयावर यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, यावेळी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान क

शिर्डी येथील सरपंच परिषदेसाठी ४० ते ५० हजार सरपंच उपस्थित राहतील !! नासिक जिल्ह्यातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण-शितल सांगळे !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी (दि.३१) शिर्डी (जि. अहमदनगर) येथे सरपंच, उपसरपंच यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी राज्यातील ४० ते ५० हजार सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्हयातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.           सरपंच परिषदेबाबत आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्यसंघटक अविनाश आव्हाड,जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर यांनीही यावेळी सरपंच परिषदेविषयी तसेच शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सरंपच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्यावे, सरपंचांमधून एक आमदार प

प्रतिक्षा संपली........ केंद्रीय राज्यमंत्री यांची छबी झळकणार !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला, प्रतिक्षा संपली......               या वर्षी निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल न्यूज मसाला वर प्रेम  करणाऱ्या सर्व मान्यवरांप्रती दिलगीरी व्यक्त करतो, तसेच आनंदाची बातमी म्हणजे न्यूज मसालाचा दिवाळी विशेषांक "लोकराजा" च्या मुखपृष्ठावर  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणार आहे.           दरवर्षी जुलै च्या सुरुवातीला मुखपृष्ठावरील सन्माननीय संसद सदस्य (खासदार) मानकरी जाहीर करण्यात येते मात्र या वर्षी उशिराने पण सामाजिक जाणीव असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रकाशित  करीत आहोत याचा मनस्वी आनंद होत आहे.            महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नामवंत व नवलेखक, कवी यांचा मेळ घालून न्यूज मसाला च्या संपादक मंडळाकडून "लोकराजा" नांवाने दर्जेदार दिवाळी विशेषांक प्रकाशित केला जातो, यांत आपले सर्वांचे, मित्रपरिवाराचे, जाहिरातदारांचे प्रेम मिळते व समाजालाही वाचनीय मजकूराचा दिवाळी फराळ मिळतो, सोबत वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन दिले जाते याचे सारे श्रेय आपले

पाटीलकी, देशमुखी व श्रीमंती या कारणामुळे उचभ्रू समजला जाणारा समाज नापिकी शेती, कर्जबाजारी यामुळे हतबल झाला आहे !! पाणीदार जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता !!! ग्रामीण भारत देश अस्तित्वात राहण्यासाठी शासनाने चांगले धोरण आखुन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे !!! सविस्तर लेख वाचून शासनापर्यंत पोहचविण्यासाठी खालील लिंक शेअर करा, पुढील पिढ्यांसाठी आजच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत !!!!

इमेज
पाणीदार नाशिक जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता ! ****************************** महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्याची ओळख ही धरणांचा जिल्हा म्हणुन ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मुंबई, जळगांव, औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांना शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. मुंबईसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. तर औरंगाबाद, अहमदनगर व जळगांव या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आधुनिक शेती व्यवसायामुळे संपूर्ण भारत देशातील बागायती क्षेत्र वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी साठ्याचा उपसा शेतीसाठी केला जात आहे. सोबत मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय उभे राहिल्यामुळे धरणांमध्ये साठविणेत आलेले पाणी औद्यगिक क्षेत्रासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खोलवर गेली आहे. त्यातच विद्युत पंपामुळे पाणी उपसा करण्याची सुविधा कमी खर्चात व सहज होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात भुगर्भातील पाणी साठा

जमीन विकून आलेल्या पैशाचा "माज" काय असतो ? "माज...फिनिश इट" नक्की काय आहे ? सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जमीन विकून आलेल्या पैशातून जो "माज" येतो व आयुष्य काय वळण घेते, हा "माज" आजच्या तरुणाईला काहीतरी संदेश देणारा ठरेल असे आशिष जैन यांना वाटते. आशिष जैन हे दिग्दर्शक असलेल्या "माज-फिनीश इट" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिक येथे आले असता त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.         गेली काही वर्षे हा विषय समाजात नैराश्य निर्माण करणारा तर काहींना जमीन विकून आलेल्या पैशांनी नवीन व्ययसायात गुंतवणूक करुन यशाची शिखरे पादाक्रांत केलीत मात्र अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. हाच मुद्दा पकडून "माज" या चित्रपटाची निर्मिती केली आहे, "माज" सकारात्मक वा नकारात्मक हे गुलदस्त्यातच ठेवले आहे, ते येत्या २ आॅगस्ट रोजी सिनेमागृहात शिरल्यावर कळेल असे चित्रपटाचे निर्माते संदीप टकले यांनी सांगितले.             या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे, "अमित रेखी व अर्चना संकेत," सोबत नाना गोडबोले, प्रकाश धोत्रे, सशांक दर्णे, मिलिंद जाधव, व्रुंदा बाळ, प्रेम नरसाळे, पूनम कापसे, चंचला बोरकर, जगदीश कुंभार, यासारखे कलाकार आहेत, स

शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! नासिक::- आलोसे राजू पुणा  रामोळे, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग सटाणा यांचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत सन २०१८) अन्वये सटाणा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.         आलोसे राजु रामोळे याने जाखेडा धरणातून गाळ काढण्याचे मोबदल्यात तसेच गाळ काढण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी १३ जून २०१९ रोजी १५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यानुसार सापळा पूर्व पडताळणी दरम्यान पंचासमक्ष रामोळे याने तक्रारदाराकडून १५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि. १९ जुलै १९ रोजी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात ! खास बातमी ::- तब्बल ११३ एन्काऊंटर करणारे मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे लवकरच राजकारणात उतरण्यास सज्ज होत आहेत. ४ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र तो आजपावेतो मंजूर करण्यात आलेला नाही.            सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते, राजीनामा व दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवायची व मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार इतकाच सोपस्कार बाकी असल्याचे कळते !

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात ! नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.       सदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

जेष्ठ विचारवंत, लेखक, राजकारणी तथा दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले काळाच्या पडद्याआड ! केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला !! न्यूज मसाला परीवार नासिक कडून भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
महान लढवय्ये विचारवंत राजा ढाले यांचे निर्वाण ! दलित पँथर चे संस्थापक,  आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,  ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज दि. १६ जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दुपारी 12 वाजता विक्रोळी (पू) येथील त्यांच्या निवसस्थानाहून निघणार,  दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे. राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ; मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्

न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! निव्वळ फार्स की ठोस कार्यवाही ची चर्चा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! नासिक::-   ४ फेब्रु. व ६ फेब्रु. १९ ला न्यूज मसालाने प्रकाशित केलेल्या बातमीची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. यासाठी प्रशासनाला तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी लागतो याबाबत जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागात कुतुहलाचा विषय ठरला असून सदर रस्ता व त्याची प्रशासनाकडून करण्यात आलेली पाहणी हा निव्वळ फार्स ठरेल की संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.           त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराकडून बनविण्यात आला व तोच रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून ही बनविला आहे असा आरोप नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांनी ग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी सदर कामाची व फसवणुकीच्या चौकशीची वारंवार मागणी केली असता अखेर शुक्रवारी (दि.१२) चौकशी समितीने पाहणी केली.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी चौकशी समिती स्थापन करुन अहवाल सादर कर

योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक !! योग आयुष्यात असणे म्हणजे रोग मुक्त आयुष्य- पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आरोग्यम धनसंपदा कार्यशाळेतून मधुमेह ,  स्थुलता निरावरणाचे धडे योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक  नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक नाशिक , दि.७ जुलै :-  योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा त्यात पदवी मिळवावी व आपल्यासोबत इतरांनीही त्याचे मार्गदर्शन करावे असे।आवाहन पंतप्रधान योग पुरस्कार विजेते विश्वास मंडलिक गुरुजी यांनी केले. आज  परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार येथे योग विद्या धामच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन केले.          या कार्यशाळेस पमुख पाहुणे नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मनोहर कानडे,ओंकार नगर (नवीन नाशिक) अध्यक्ष राजेंद्र फड,योगशिक्षिका कांचंनताई खाडे,योगविद्या धामचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पुरी, अमरजीतसिंग गरेवाल, डॉ. विद्याताई देशपांडे,आशाताई वेळूकर,निलेश वाघ, योग शिक्षक व साधक उपस्थित होते.याप्रसंगी किशोर वयीन मुलांसाठी योग व मसाज तंत्र व मंत्र या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

जिल्हा परिषद बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...! शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
      बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...      शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध        सिंधुदुर्गनगरी:- महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गुरुवारी कणकवली येथे चिखलाच्या पाण्याने घालण्यात आलेले आंघोळ प्रकरण जिल्ह्यातील शाखा अभियंता यांनी गंभीर घेतले आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम समिती सभेला विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी अनुपस्थित राहत निषेध व्यक्त केला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सचिव म्हणून सभेला उपस्थिती लावली. दरम्यान, सर्व अभियंत्यांनी रजेचा अर्ज टाकत घटनेचा निषेध केला आहे.            सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या या सभेला सदस्य प्रदीप नारकर, राजेश कविटकर, श्रिया सावंत, राजन मुळीक यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी आ नितेश राणे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता शेडेकर यांना कणकवली बाजार पेठेतील रस्ता पाहण

पुरेसा पाऊस न झाल्याने टँकर लागण्याची शक्यता असल्यास टँकर वाढविण्यासाठी तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक : - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज जिल्हयातील पाणी टंचाईबाबत तालुक्यांचा आढावा घेवून विविध सुचना केल्या. जिल्हयात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे काही तालुक्यांमध्ये टँकर लागण्याची परिस्थिती असून गटविकास अधिका-यांच्या आढाव्यामध्ये जिल्हयात १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याने टँकर वाढविण्याची  गरज असल्यास तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.            जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेताना पाणी टंचाईबाबत राबविण्यात येत असलेल्या उपयायोजनांची माहिती घेवून प्रत्येक गावाला पाणी पुरवठा होईल यासाठी जबाबदारीने काम करण्याचे तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणी टंचाईबाबत दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.                 यावेळी पर्जन्यमानाबाबत माहिती घेवून विंधन विहिरींचाही आढावा घेण्यात आला. पाणी टंचाईचा सामना करण्या

सुविचार गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
सुविचार गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन   नाशिक दि. ०३ (प्रतिनिधी) :- कला, क्रीडा, कृषी, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, प्रशासन व उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे तसेच नावे सुचविण्याचे आवाहन सुविचार गौरव मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांनी केले आहे.              समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामांन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. सोमवार दि. ०८ जुलै २०१९  पर्यंत हे प्रस्ताव एफ-१०, नानाजी शेटे बिझीनेस सेंटर, कॅनडा कॉर्नर, नाशिक या कार्यालयात सकाळी १२ ते ३ या वेळेत प्रत्यक्ष सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.             यापूर्वी नाशिक येथे आयोजित शानदार कार्यक्रमात सन २०१७ मध्ये  माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांच्या शुभहस्ते तर सन २०१८ मध्ये माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते “सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा” संपन्

मुख्यमंत्र्यांना कर्मचारी महासंघाचा इशारा ! कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा,अन्यथा संप करण्याची वेळ येईल असं करु नका, असा इशारा जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून निदर्शने करून देण्यात आला !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत  प्रश्न मार्गी लावा .... अन्यथा संपाची वेळ आणू नका .. जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचा इशारा .. जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आज  दि. ३ जुलै रोजी जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ व सलग्न सतरा संवर्गीय कर्मचारी संघटनांचे वतीने संपाचे पाश्र्वभूमीवर दि ४ ऑगस्ट १८ ला मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने, जोरदार निदर्शने करून प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी सर्व संवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. . प्रमुख मागण्या : राज्य सरकारी कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतन भत्ते देणे, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच  पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या तात्काळ देणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना दोन वर्ष संगोपन रजा मंजुर करणे,सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे नविन पदे निर्माण करुन जिल्हा परीषद संवर्गातून रिक्त

सातवा वेतन आयोग अधुराच, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी आज करणार निर्दशने !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
सातवा वेतन आयोग अधुराच,कर्मचारी करणार ३ जुलै ला निर्दशने ... मागील वर्षाचे तीन दिवसाचे संपानंतर राज्य शासनाने १ जाणेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून,राज्यातील कर्मचारी यांना दिलासा दिला, मात्र सातवा वेतन आयोगातील त्रुटीमुळे अंमलबजावणी अधुरीच असल्याने कर्मचारी मध्ये नाराजीची संतप्त भावना आहे .   यशस्वी संपानंतर राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समीती आणि मा मुख्यमंत्री यांचे ४ ऑगस्ट१८ च्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतन भत्ते देणे, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच  पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या देणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना दोन वर्ष संगोपन रजा मंजुर करणे,  सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे नविन पदे निर्मिती करुन जिल्हा परीषद संवर्गातून रिक्त व नविन पदे भरणे, परीभाषीत पेन्शन योजनेतील कर्मचारी यांचे १० वर्षाचे आत मृत्यु झाल्यास वारसास १० लाख सानुग्रह अनुदान मंजुर करणे, अंशदाई पेन्शन धार

नासिक जिल्ह्यातून नांदेड येथील अधिवेशनास ३५० जणांची उपस्थिती राहणार !!!-- जिल्हाध्यक्ष पवार यांची माहिती,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नांदेड येथील अधिवेशनास ३५० पत्रकार उपस्थित राहणार ! जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती पिंपळगांव( ब )::-नांदेड येथे १७ व १८ ऑगस्ट रोजी होणाय्रा मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनास नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ३५० सभासद पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.          पिंपळगाव बसवंत येथे स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष यांची संयुक्त बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद, मुबई हि देशभरातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना असून मातृसंस्था असलेल्या परिषदेच्या आजवर झालेल्या प्रत्येक अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांची लक्षणिय उपस्थिती राहिली आहे. हि परंपरा नांदेड येथील अधिवेशनात कायम राहणार असून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सुमारे साडेतिनशेहून अधिक सभासद उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला, स्वागत निफाड तालुकाध्यक्ष अँड रामनाथ शिंदे यांनी केले.        सरचिटणीस कल्याणराव आवटे यांनी प्रस्ताविक करुन तालुकानिहाय अधिवेशन नियोजना

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध संघटनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अनिल लांडगे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू व्यक्यिमत्वा मुळे जिल्हयासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले असून पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना अनिल लांडगे यांनी आजपर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली तसेच जिल्हा परिषदेत काम करताना अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असून अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध नियम तसेच त्यांच्या हक्कांबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना शिक्षण सभापती यतीन पगार यांनी लांडगे हे अभ्यासू अधिकारी असल्याचे सांगत यापुढेही त्यांनी विकासासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. उप मुख्य

दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!! थोडक्यात बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!!              दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत केंद्र शासनामार्फत सदर विषय मार्गी लावणेकामी शून्यकाळात विनंतीपूर्वक प्रश्न सादरीकरण करताना डॉ.भारती ताई प्रवीण पवार हीच परिस्थिती कायम राहिली आणि शासनामार्फत जर यावर काही तोडगा काढला गेला नाही तर डिसेंबर अखेर पर्यंत जवळपास 3000 गावांच्या वर दुष्काळाचे भयंकर सावट तयार होईल. करिता केंद्र सरकार द्वारा जलयुक्त शिवार अभियान व इतर योजनांच्या अंतर्गत सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

आयपीएस अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला आयपीएस अधिकारी दर्जा ! पोलिस आयुक्त व डॉक्टर यांचे सर्व स्तरांतून स्वागत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली मानवता क्युरी हास्पीटल येथे  सागर बोरसे याची भेट IPS अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला IPS  अधिकारी दर्जा !         आज दिनांक २७ जून रोजी आपले नाशिक शहराचे आवडते पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा एकदा शहराला नव्हे तर माणुसकीला शोभेल असे एक उदाहरण समोर केले निमित्त होते ते एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर मधील एक पेशंट चि. सागर बोरसे याच्या इच्छेचे आणि ऑपरेशन पूर्वी व्यक्त केलेली इच्छा. सागरच्या पायाला झालेल्या कॅन्सरमुळे आज त्याचा पाय गुडघ्यापासून काढण्याची शस्त्रक्रिया होती. सागरला आयुष्यात आयपीएस ऑफिसर बनायचे आहे. पण काळाने घातलेला घाला आणि त्यावर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने थोड्या वेळासाठी का होईना पण मिळवलेला विजय यावर मात म्हणून सागरची असलेली प्रबळ इच्छाशक्ती हेच एक जिवंत उदाहरण. सागर ने डॉक्टर राज नगरकर यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली ती होती आपले नायक पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांना  भेटण्याची. डॉ. राज नगरकर यांनी क्षणाचाही वि

भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर !! ग्रुप रेनोची नवीकोरी कार, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर ! भारतीय वाहनबाजारात लवकरच दाखल होत आहे रेनो ट्रायबर !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
## भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर   ग्रुप रेनोची नवीकोरी, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर !  ## ## रेनो ट्रायबर ## नवी दिल्ली::- रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर ची आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन जे भारतीय बाजारपेठांसाठी डिझाईन केले आहे.          “ग्रुप रेनोकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ समजून भारतात रेनो उचलली आहे,  कंपनीची महत्त्वाकांक्षा ही धोरणात्मक योजना "ड्राईव्ह द फ्युचर" प्रमाणे मोठी आहे. 2022 पर्यंत रेनोची विक्री दुप्पट करायची आहे. रेनो ट्रायबर ही एक अद्वितीय संकल्पना जी प्रमुख भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. रेनो ट्रायबरचा जन्म, विकास आणि निर्मिती भारतातील आहे, भारतीय ग्राहकांचा प्राधान्याने विचार करून ती बनविण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याआधी ती भारतात उपलब्ध होईल. हे वाहन खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे," असे ग्रुप रेनोचे सीईओ थिएरी बोल्लो

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !! नासिक::- वाडीवऱ्हे येथील वडीलोपार्जित शेतगट ५३ चे फेरफार रजिस्टर चर्या ६(ड) नोंदीच्या नकला देणेकरीता तत्कालीन तलाठी सुनतीलाल शिवाजी गावीत याने ४००/- रुपये लाचेची मागणी केली होती. सदर रक्कम १३ आॅगस्ट २०१४ ला वाडीवऱ्हे बाजार पटांगणात स्विकारण्यात आली होती, त्यांचा गुन्हा वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते त्याचा निकाल काल मा. जे. पी. झपाटे , जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ नासिक यांनी निकाल दिला असून कलम ७ प्रमाणे तीन वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद, तसेच कलम १३(२) प्रमाणे चार वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे गुन्ह्याचे कामकाज श्रीमती विद्या जाधव यांनी पाहीले.

पोलिस अधिकारी, कर्मचारी यानी सहकुटुंब लुटला नाटकाचा आनंद !! भरत जाधव चा पोलिस आयुक्तांनी केला सत्कार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
                 नासिक::-पोलीस आयुक्तालय नाशिक शहर व एकदंत फिल्मस यांच्या संयुक्त विद्यमाने काल कालिदास कलामंदिर येथे भरत जाधव निर्मित "मोरूची मावशी"  या मनोरंजनपर नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकुटुंब नाटकाचा आस्वाद घेतला. नासिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांचे वतीने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव व एकदंत फिल्मसचे प्रोड्युसर अमित कुलकर्णी यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त श्रीमती माधुरी कांगणे,पोलीस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले व सर्व सहा.पोलीस आयुक्त उपस्थित होते .

सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी !!              नासिक::- आपल्या 'व्यवस्थेतच ' भयानक दोष आहे. मराठा समाजासह धनगर ,आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत ? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे पाणी का गेलं नाही ? त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही ? असे अनेक प्रश्न राज्या समोर आ वासून उभे आहेत.आणि दुसऱ्या बाजूला या समस्यांना सामोरे जात असताना पर्याय मिळत नसल्याने या प्रत्येक समाजातील घटक जीवन संपविण्याचा निर्णय घेत गळ्याला फास लावून घेत आहे.एकामागून एक माणूस अशा पध्दतीने स्वतःला संपवू लागला तर शासन नावाची व्यवस्था प्रेतांवर राज्य करणार आहे का? अशा ओसाड मनोवृत्तीचा कारभार सुरू असेल तर आपल्या सर्वांना आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,आपण हा सारा उपद्व्याप का आणि कुणासाठी करतो आहोत? म्हणूनच समाजाच्या पदरात त्याच्या हक्काचे योग्य दान टाकण्याचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.पहिली पायरी म्हणून सध्या ऐरणीवर असलेला मराठा, धनगर,  मुस्लिम आर