नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार !

नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार !

लातूर (प्रतिनिधी)::- डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ३१ जुलै रोजी वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.

      कथासंग्रह, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मचरित्र व आंबेडकरी साहित्य अशा सहा प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.
      प्रथम १५००/- द्वितीय १०००/- व तृतीय ७५०/- रुपये, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. एकुण १८ पुरस्कारांमध्ये बालसाहित्य गटांत नासिकच्या प्रा. सौ. सुमती पवार व कविता गटातून कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
        लातूर येथील बस स्थानकाशेजारील डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृहात ३१ जुलै रोजी सकाळी ११:३० वा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. अॅड. श्रीधर गायकवाड, सचिव प्रकाश घादगिने यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!