कोरोनापूर्वीच केली होती घोषणा, 'एकदा काय झालं !'




एकदा काय झालं' मराठी
 चित्रपट येणार ५ ऑगस्टला !   
 नाशिक ( प्रतिनिधी )::- पुणे टॉकीज प्रा. लि. आणि हेमंत गुजराथी यांची प्रस्तुती असलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांनी सांगितले. यावेळी संदीप यांनी काही कविता सादर केल्या. त्यातून चित्रपटाचे कथानक उलगडले.
    ‘एकदा काय झालं ’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकतो, अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी ! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं ’ हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणे ही डॉ. सलील कुलकर्णी यांची खासियत आहे. त्यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. ‘एकदा काय झालं ’ या चित्रपटाची घोषणा त्यांनी कोरोनापूर्वीच केली होती. मात्र, आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे, अभिनेता सुमीत राघवन हा कलाकार अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.
    सुमीत राघवन यांच्यासह मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री या दिग्गज कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे या चित्रपटात पदार्पण करत आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे, तर त्यांचा मुलगा आणि संगीतकार सिद्धार्थ महादेवन, शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे.या चित्रपटातील गाणी हा चर्चेचा विषय ठरणार आहे, कारण या चित्रपटातील गाण्यांना अनेक दिग्गजांचे योगदान लाभले आहे. ‘एकदा काय झालं !’ मधील ‘रे क्षणा’ हे गाणं प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी म्हणले असून, यातील अंगाई ही सुनिधी चौहानने गायली आहे. तर राम आणि श्याम हे गाणं शुभंकर कुलकर्णीने गायले आहे. तर संदीप खरे, समीर सामंत, डॉ. सलील यांनी या चित्रपटातील गीते लिहिली आहेत. या गाण्यांना ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत ‘एकदा काय झालं ! ’ या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दात्ये, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सौमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।