जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !
जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !
नासिक::- जिल्ह्यात खरीप हंगामास नुकतीच सुरुवात झाली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बियाण्याची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, बियाणे खरेदी करत असताना विक्रेत्याकडून पक्क्या बिलाची मागणी करावी व त्या बिलाप्रमाणेच रक्कम अदा करावी. सदर बिल पावती जपून ठेवावी. जो विक्रेता बियाणे एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत विक्री करत असेल, तसेच पक्के बिल देत नसेल त्याची तक्रार तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी, पंचायत समिती तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे किंवा तक्रार निवारण कक्ष व्हाट्सअप क्रमांक ७८२१०३२४०८ यावर संदेश पाठवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात आले आहे की कोणीही बियाणे निर्धारित एमआरपी पेक्षा जास्त दरात विक्री करू नये तसे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी प्रशासनाकडून संपर्क दूरध्वनी देण्यात आले आहेत.
१) जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, संजय शेवाळे- ९४२२२२४४५१
२) मोहीम अधिकारी, दीपक सोमवंशी- ९९७५४३४४१८
३) जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, डॉ. जगन सूर्यवंशी- ९४०३५४६३३८
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधिक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा