टोकाचा निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करा !! निसर्ग सुद्धा कोरोना च्या निमित्ताने हेच तर सांगत नसावा ना ! एन.के.मोरे , राजाजी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

एन. के. मोरे, राजाजी
आत्महत्या करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा,,,,,,

                   कोरोना च्या महामारीत सर्व जगावर संकट आले आहे,,आपल्याच भारत देशात नव्हे तर चीन सारख्या देशात भूकबळी ने लोक मरतात आहे,,आत्महत्या करण्यापूर्वी एक वेळ  आपल्या पेक्षा ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांच्या कडे बघा,,,आज झोडपट्टीत राहणारे रस्त्याच्या कडेला राहणारे लोकांकडे बघा , त्याना चिंता नाही का उद्याची,,,,रोजंदारीवर जाणारे, हॉटेल मध्ये काम करणारे, धुनी भांडी करणारे, ही माणसे नाही का? त्यांना पण भविष्याची चिंता नसेल का, त्यांना कोरोनाची भीती वाटत नसेल का, पण तरीही बघा त्यांच्या कडे किती आनंदात जे काही रोज मिळते त्या वर गुजराण करीत आहेत,,, पण ते विचार नाही करत आत्महत्या करण्याचे, या फोटो मध्ये जे दोघे जण दिसतात, ते गिरणारे जवळील धोंडे गावातील आहेत हिरामण खाडे व त्याचा मेव्हणा आज सकाळी ५ वाजता घर सोडून कामासाठी नाशिक ला आले, माझ्या बंगल्यातील नारळाच्या झाडावरील नारळ उतरवून दिले त्यात दोन तीन तास त्यांचे गेले, मजुरी ६०० रु., मिळाली शेजारील पाटील काकू व डॉ शिवदे यांच्या कडील नारळ काढून दिले दोन्ही मिळून ९०० रु. मिळाले, चार तासात १५०० रु. त्यांनी मजुरी मिळवली,,,इतर वेळेस थोडी फार शेती करतात, नाही तर कोणाच्या झाडाच्या फांद्या काढून दे, किंवा नारळ काढून दे, अथवा गार्डन चे काम करतात, नेहमी काम मिळत नाही पण वीस दिवस जरी काम मिळाले तरी तीस हजार रुपये कमाई होते, म्हणाले म्हणजे एक एकाला १५ हजार,,,,पण हे सर्व काम करताना हे काम हलके आहे, मला शोभणार नाही, हा मनातील समज प्रथम दूर करा मी स्वता हॉटेल व्यवसाय, शेती असणारा, मी सुद्धा विचार करत आहे कुठे तरी साईड वर अथवा कोणाकडे कामास जावे तेव्हढेच दोन पैसे या लॉक डाऊन च्या काळात घरात येतील, तर हात जोडून नम्र विनंती मित्रांनो हे पण दिवस निघून जातील, कदाचित हे संकट खुप काही शिकवण्याकरता निसर्गाने मानव जातीवर आणले असेल या निमित्ताने तरी पैसा व नाते सबंध किती महत्वाची असतात व ते जपून ठेवली पाहिजे, म्हणजे संकट समयी उपयोगात येते हे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे, आणि निसर्ग सुद्धा कोरोना च्या निमित्ताने हेच सांगत तर नसावा ना ?,,,,तर कुठले ही खोटी प्रतिष्ठा न बाळगता या दिवसात मिळेल ते काम व त्या कामातून दोन पैसे कसे मिळतील ते बघा,,,,,,म्हणजे आत्महत्या सारखे विचार मनात येणार नाही,,,,,

टिप्पण्या

  1. निवास अण्णा छान लेखन, हिरामण भाऊचा नंबर दे आमच्या पण तीन झाडांची नारळ व लोहाडे माझ्या समोर बंगला आहे त्यांची दोन झाड नारळ काढायची आहे

    उत्तर द्याहटवा
  2. मित्रा,
    वास्तववादी लेख आहे
    छान..

    उत्तर द्याहटवा
  3. निवास जी जे सांगितले ते खर आहे. माणसान लाज बाळगता कामा नये. सध्याच्या काळात मिळेल ते काम महत्वाच आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!