पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान..... !! एक मोठं कुटुंब तयार झालं याचा मला अभिमान वाटतो, या कुटुंबातील  सदस्य शिक्षकांना सामना कराव्या लागणाऱ्या स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी आपल्या सोबत राहील - अध्यक्ष संजय देवरे !!! एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in -संपादक नरेंद्र पाटील ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान.....          जळगाव ::- एस. के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुणे जळगावच्या प्रथम नागरिक सिमाताई भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी तहसीलदार कैलास चावडे, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य चौधरी , जैन ग्रुपचे किशोर कुलकर्णी, एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय देवरे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.           पुरस्कार वितरणानंतरच्या एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे यांनी जिल्ह्यातील उपस्थित शिक्षक, त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील पाहीलेले वास्तव व त्यातून पुढे समाजातील घटकांसाठी कार्य करणे, ही भावना रूजविण्याचे अपरोक्षपणे,  व अव्याहत कार्य शिक्षकांकडून केले जाते अशा सर्वच शिक्षकांचा हा गौरव सोहळा आहे, याप्रसंगी त्यांनी देवळा तालुक्यातील खेड्यातून मी तेथील शिक्षकांनी मला दिलेले सं

विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन-अध्यक्षा शितल सांगळे ! जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे गरजेचे-भुवनेश्वरी एस. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!

इमेज
नाशिक – समाजाला समृध्द आणि सशक्त करण्याची क्षमता शिक्षणात आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे काळाची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.         जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आज वडाळारोडवरील अशोका कॅम्पसमध्ये नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ सांगळे बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विविध सामाजिक संघटना, कारखाने यांचे एकत्रिकरण करण्यात येवून सीएसआर सेलची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत आज सर्व घटकांसाठी नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले.         पुढे बोलताना शितल सांगळे यांनी शाळाबाहय मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांप्रमाणेच क्रिडाविषयक सुविधा व म

वेडं मन तुझ्यासाठी, येईल, पोहचेल, ऐकशील,. न्यूज मसाला परीवाराकडून शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
"वेडं मन तुझ्यासाठी" चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक विजयकुमार घोटे यांचं दुःखद निधन ! न्यूज मसाला परीवाराचा हितचिंतक आज दि. ३० आॅगस्ट २०१९ रोजी आपणा सर्वांना दुरावला, त्यांस शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!! विजू, तुला आई आणि वडील यांनी "विज्या" हि हाक मारली की नाही मला माहीत नाही, परंतु ते सोडून तुला मिळालेल्या आयुष्यात दुसऱ्या कुणी अशी हाक मारली नसेल, तुझा स्वभावच मुळी सडेतोड, परखड पण आदबशीर होता आणि आज अचानक तु आम्हा सर्वांना सोडून गेलास, अनेकांनी आज हक्काने व तुझ्या निघून जाण्याच्या दुःखाने  "विज्या" तुझं "वेडं मन तुझ्यासाठी" च राखून ठेवलं रे म्हणत बैलपोळ्याचा अमावस्येच्या दिवशी (जे तुला कधी पटत नव्हते) सर्वांचे "मन" खट्टू करुन गेलास !           आदिवासी समाज तुझ्याकडे एक पत्रकार, यशस्वी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, भावी राजकीय नेता, समाजाचा आधारस्तंभ अशा भावनेने सतत पहात होता, तुझ्या संपर्कात आलेल्या अनेकांना तुझा बौद्धिक व सामाजिक  सहवास हवाहवासा वाटायचा, नव्या धागूर ता. दिंडोरी जि. नासिक येथून मुंबई दिल्ली पर्य

२८ वी वार्षीक क्रिडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ! विजयी खेळाडू पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरतील व यश संपादन करतील-पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!!

इमेज
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आयोजित २८ वी वार्षिक किडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आजचा दिवस हा मेजर ध्यानचंद यांचा स्मृती दिन असल्याने संपूर्ण भारतात किडा दिन साजरा केला जातो. सदर किडा स्पर्धा २७ ते २९ ऑगस्ट, २०१९ या कालावधीत पार पडली.  किडा स्पर्धेत पोलास आयुक्तालयातील परिमंडळ १, परिमंडळ२, पोलीस मख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय व इतर शाखा अशा ०४ संघांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत एकुण १५० पोलीस खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅन्डबाॅल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो असे पुरुष सांधीक खेळ व महिलांकरीला व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबडडी, खो-खो यांचा समावेश होता. वैयक्तीक खेळांमध्ये पुरुष व महिलांचे १००, २००, ४००, ८००, १५०० मीटर धावणे, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक, भालाफेक, रिले. क्रासकंट्री, मॅरेथॉन तसेच कुस्ती,  बाॅक्सिंग, वेटलिफ्टीग, जुडो, तायक्वांदो यांचा समावेश होता. स्पर्धा अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बेस्ट अॅथ

नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!

इमेज
नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू ! नासिक::- पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांची बागलाण (सटाणा) येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तपदी नंदुरबार जिल्हा परिषदेतून बढती बदलीने सारीका बारी यांनी आज नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.         सारीका बारी या मुळच्या धुळे जिल्ह्यातील असून त्यांचे शिक्षण उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेल्या जय हिंद महाविद्यालय धुळे येथे झाले आहे. त्यांच्याशी आमच्या प्रतिनीधीने संपर्क साधला असता त्यांनी कुपोषण, शिक्षण व आरोग्य याविषयी काम करण्याचे मनोगत व्यक्त केले, त्याचबरोबर पंचायत समितीच्या इतर विभागातील कामकाजावर लक्ष देण्यात येईल, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आपसातील विश्र्वासात दृढता निर्माण करून तालुक्याच्या विकासासाठी झटणार, प्रलंबित कामांचा निपटारा करतानाच नवीन कामांकडे लक्ष देण्यात येईल अशी माहिती दिली.

द हंग्री' मराठी चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ! मराठीतील अनकट वनटेक सलग ४ तास २ मिनिट ५३ सेकंद चित्रपट !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल न्यूज मसाला, संपादक नरेंद्र पाटील, !!!!

'द हंग्री' मराठी चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ! -  'द हंग्री' चित्रपट मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र ठरला आहे. मराठी चित्रपट सृष्टीत अशा प्रकारच्या चित्रपटाचा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. 'द हंग्री' हा मराठी भाषेत तयार होणारा हा चित्रपट ४ तास ०२ मिनिट ५३ सेकंद अनकट वनटेक चित्रपट आहे. अशा मोठया चित्रपटाचे तो हि अनकट म्हणजे वन टेक असणाऱ्या प्रीमियर-शो झाल्यानंतर याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये करण्यात आली. संतोष राऊत व नितीन चव्हाण  दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ०६ जानेवारी २०१९ रोजी पुणे येथे चित्रित करण्यात आला आहे.या प्रसंगी गिनीज रेकॉर्डचे प्रतिनिधीं उपस्थित होते. मराठी भाषेतील जगातील पहिला अनकट वनशॉट, सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट ठरला. हा चित्रपट भारतीय सिनेमातील एक अनोखा प्रयत्न होता, जो मराठी सिनेमाला नवीन उंचीवर घेऊन गेला असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाचे मयुरेश जोशी (डी.ओ.पी.) यांनी चित्रीकरण केले आहे. तांत्रिक दिग्दर्शन अभीर कुलकर्णी तर संगीत ओमकार केळकर यांचे लाभले आहे, या चित्रपट

जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येणार- भुवनेश्वरी एस. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक – मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी महिला व बालविकास विभागाच्या सर्व संबधित अधिकारी व कर्मचा-यांना पोषण अभियानाबाबत सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या महिला व  बालविकास विभागाच्या वतीने पोषण अभियानाबाबत आज जिल्हास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळणेसाठी व माता व बालकाचे पोषण योग्यरित्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी प्रभातफेरी, दिंडी, विविध स्पर्धा. पोषण मेळावे आदि विविध प्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिले असून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनाही या

कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!!!

इमेज
आयटक च्या शताब्दी वर्षात कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर              मुंबई: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) भारतातील पहिली कामगार संघटना आयटक ची स्थापना मुंबई येथे ३१ ऑक्टोबर १९२० रोजी तत्कालीन न्यू एम्पायर थिएटर व्ही.टी. जवळ झाली. लोकमान्य टिळक हे  नियोजित अद्यक्ष होते मात्र ते दिवंगत झाल्या मुळे लाला लजपतराय पहिले अद्यक्ष झाले. त्यांनी पहिल्या स्थापना अधिवेशनात भारताला  संपूर्ण स्वातंत्र्या ची मागणी केली. कामगारांनी स्वताच्या विकासासाठी  संघटित होण्याचे आवाहन केले. देशभरातील वेगवेगळ्या विचाराचे लोक कामगार एकत्र येत होते. देशातील सार्वजनिक उद्योग उभारण्यासाठी कामगार चळवळीचे योगदान तेव्हापासून आजतागायत आहे. एम्पाइज  कॉम्पेजेशन ऍक्ट १९२३ कायदा, ट्रेड युनियन ऍक्ट १९२६, पेमेंट वेजेस ऍक्ट १९३६, इंडट्रीयल डिस्फुट ऍक्ट १९४७, फॅक्टरी ऍक्ट १९४८, पेमेंट बोनस ऍक्ट १९६५, महागाई भत्ता कायदा १९३४,  करण्यासाठी आयटक चे योगदान आहे. आज हे कामगार चळवळीने मिळविलेले कायदे मोडून काढले जात आहेत. यामुळे आज पुन्हा कामगार एकजुटीची गरज निर्माण झाली आहे. आयटक च्या शताब्दी वर्षात त्य

आरोग्य सेवेतील महामेरु दिलीप वैद्य यांचे निधन ! आज पहाटे पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, न्यूज मसाला परीवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
आरोग्य सेवेतील महामेरु दिलीप वैद्य यांचे निधन ! नाशिक जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवेतील कुष्ठरोग तंत्रज्ञ ते  सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्री. दिलीपजी वैद्य उर्फ काका यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दीपाली, मुले अनुक्रमे मयुर, रोहित, मुलगी अश्विनी, सुन, जावई असा परिवार आहे. दिलीप वैद्य हे नांव नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कर्मचारी यांचेसाठी परिचित असे नाव. नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या हजारो बेरोजगार युवकांना शासकीय सेवेची संधी दिलीप वैद्य यांनी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना शासकीय नोकरीच्या संधी दिलीप वैद्य यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या नव्हे गरीब कष्टकरी मुलांचे संसार उभे करण्याचे मोठे काम दिलीप वैद्य यांनी उभे केले असे अभिमानाने नमुद करावे लागेल. श्री. बाळासाहेब ठाकरे, श्री. महेश पैठणकर, श्री. सुभाष कंकरेज,  श्री.राजु निकुंभ व श्री. मधुकर आढाव, श्री.दिपक अहिरे, श्री.श्रीकांत अहिरे, श्री. राजेंद्र बैरागी यासारखे नेतृत्व गुण असणारे आरोग्य सेवेत

तालुक्याच्या इतिहासात सर्वात तरुण आणि अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड नक्की होईल यात शंका नाही ! उमेदवारी मागणीची मुलाखत दिल्यानंतर व्यक्त केला विश्वास !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
तुळजापूर विधानसभा परत एकदा उमेदवारी ची दावेदारी               तुळजापूर (दि.२६)::- भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी साठी योगेश केदार यांनी मुलाखत दिली. पक्षाच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शेखर चर्हेगावकर यांच्यावर असून पक्षाची ही प्रक्रिया आहे. ती पूर्ण करण्याचे काम केदार यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी विश्वासपूर्वक सांगितले की, वरिष्ठ नेतृत्व आणि पक्षावर माझा विश्वास आहे. तालुक्याच्या इतिहासात सर्वात तरुण आणि अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड नक्की होईल यात शंका नाही. मी छत्रपतींचा एक मावळा आहे याचा मला अभिमान आहे, त्यानुसार शासनस्तरावर माझ्या संबंधांच्या जोरावर कोणतेही राजकीय पद नसताना मतदार संघाचे विकासासाठी योगदान देत आहे, अनेक योजनांना मंजूरी मिळवून आणली, काही पूर्णत्वास आल्यात तर काही प्रगतीपथावर आहेत, तुळजापूर मतदार संघाचा विकास हा ध्यास उराशी बाळगून मी सतत कार्यरत आहे व राहील असे त्यांनी पक्षाचा उमेदवारी मागणी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.

बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं ! जुन्या काळातील फंडे क्रमांक-१,. माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या मित्रांना शेअर करा !!!

साप्ताहीक न्यूज मसाला, नासिक, जुन्या काळातील फंडे, क्रमांक-१ "बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं !"                बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडत असेल व रडणे थांबवायचे असेल तर काही उपाय तुम्हाला ऐनवेळी मदत करु शकतात ! लहान मुलांना आपल्याला काय होत आहे हे सांगता येत नाही. ती फक्त रडून आणि चिडून आपला त्रास व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाही. यामुळे बाळाचा स्वभाव चिडका होत जातो व बाळ जसजसे मोठे होते तेव्हा त्याच्या मेंदूवर ताण पडत जातो व एका विशिष्ट बुद्ध्यांकाजवळ बाळ येऊन ठेपते. बाळाने दिवसात काही प्रमाणात रडणे हेही शारीरिक बळकटी साठी गरजेचे आहे. मग प्रश्र्न निर्माण होतो की बाळाला रडू द्यावे की नाही ? यावर मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून पालकांनीच ठरवावे की नक्की बाळ का रडत आहे ? त्याची रडणे हि एकमेव भाषा असून तिचा अर्थ पालकांनी समजून घेतला तर कधी कधी बाळाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करणेही उचित ठरते. मात्र कारणमीमांसा करताना गल्लत होऊ शकते असं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळाचे पाय उलटे धरुन हलविल्यास (याला ग्रामीण भाषेत "हासली भरणे" म्हणतात), काही सेकंदात ब

जेव्हा झोपडीतील गरीबाच्या मुलाची आमदारकीसाठी मान्यवरांकडून शिफारस केली जाते ! तिकीट घोषित करायला अजून थोडा अवकाश असला तरी मी तरी आनंदाने या मुलासाठी सकारात्मक असेल-चंद्रकांत पाटील !! खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर वाचा, त्याच कर्तृत्ववान , जिगरबाज मुलाच्या शब्दांत !!!

इमेज
तुळजापूर विधानसभा एक पाऊल अजून पुढे! योगेश केदार यांच्याच शब्दांत ! ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,                चंद्रकांत दादांची आज मुंबईमध्ये भेट झाली. छत्रपती संभाजीराजेंनी माझ्या उमेदवारीसाठी मोहीमच उघडली आहे. श्रीमंतासाठी तर कुणीही शिफारस करेल, पण एक झोपडीत राहणाऱ्या गरीबाच्या मुलासाठी आमदारकीची शिफारस मी करतोय. दादा महाराष्ट्रामध्ये हक्काने मी योगेश केदार चीच सीट मागतोय. मुख्यमंत्री देवेंद्रजीना सुद्धा मी बोललोय. आज पर्यंत मी भाजप कडे काहीच मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही. अश्याप्रकारे,  माझ्या विषयी राजे आणि दादा जवळपास अर्धा तास चर्चा करत होते.           राजेंनी दादांना सांगितलं की, दिल्लीमध्ये राहून खूप मोठमोठी कामे योगेश नी केली आहेत. जिल्ह्यासाठी सुद्धा अनेक मोठे प्रकल्प घेऊन जाण्यासाठी त्याची धडपड चालू असते. रेल्वे , पासपोर्ट कार्यालय, पाईपलाईन ने गॅस पुरवठा योजना, २१ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, तुळजाभवानी मंदिरासाठी १.५० कोटी रुपये केंद्रशासनाकडून मंजूर(तत्वतः) केले आहेत.          अनेक देशांच्या राजदूतांसोबत वैयक्तिक संबंध प्रस्थापित याने केले आहेत. प्रशासकीय अनुभव

नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते तर सरचिटणीसपदी दिलीप निकम ! जाहिरात संस्थांच्या संघटनेची बिनविरोध निवडणूक पार पडली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते  तर सरचिटणीसपदी दिलीप निकम नाशिक- दि .25- येथील जाहिरात संस्थांची संघटना नाशिक ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा )च्या नूतन कार्यकारिणिची निवड करण्यात आली असून , अध्यक्षपदी  श्री   ऍडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन गीते पाटील  यांची तर सरचिटणीसपदी वत्सदा ऍडव्हर्टायझिंगचे संचालक दिलीप निकम  यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल राजभोज येथे संपन्न झाली. मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. भाऊसाहेब  गंभीरे  यांनी काम पाहिले. त्यांना संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे व अमोल कुलकर्णी यांनी साह्य केले.  अध्यक्षपदासाठी सचिन गीते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . त्यावर कोणीही विरोध न दर्शवता गीते यांच्या निवडीला एकमताने  संमती देण्यात आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घोषित केले तर दिलीप निकम यांचे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले . उपाध्यक्ष पदासाठी श्रीशुभ अँड चे महेश कलंत्री यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली . नूतन अध्यक्

राजलक्ष्मी अर्बन को. आॅप. बॅंक लि. नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ! आमदार डॉ राहुल आहेर यांनी वाढदिवस साजरा न करता होणा-या सर्व खर्चाची रक्कम कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in.

इमेज
नासिक (दि.२४)::- राजलक्ष्मी अर्बन को.आॅप. बॅंक लि.नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.               २२ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास कायम करून ३१ मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक अहवालास मंजूरी देण्यात आली. नफा वाटणीस व लाभांश वाटप, मागीलवर्षी झालेला जादा खर्च व पुढील खर्चाचे अंदाजपत्रक, तसेच एकरकमी परतफेड करणे योजना स्विकारलेल्या व त्याअंतर्गत बंद झालेल्या थकीत कर्ज खात्यांची माहिती ची नोंद घेऊन मंजूरी देण्यात आली, आयत्या वेळी आलेल्या विषयांवर   चर्चा करण्यात आली.            सभा सुरू होण्यापूर्वी आजच भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटलींचे निधन व मागील वर्षभरात बॅंकेशी निगडित, हितचिंतक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञात-अज्ञात व्यक्तिंचे निधन व सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सभेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली.            बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांचा १६ आॅगस्ट रोजी असलेला वाढदिवस साजरा न करता होणाऱ्या सर्व खर्चाची रक्क

अल्ट्रा मॉड्यूलर गेम चेंजर मानल्या जाणाऱ्या ट्रायबरचा २८ ऑगस्ट रोजी शुभारंभ ! फक्त ११००० रुपये भरून नोंदणी करता येईल ! नाबाद लवचिकता. रेनो ट्रायबर हा खरा गेम चेंजर असून ते एक आधुनिक, प्रशस्त तरीही आटोपशीर, फारच संक्षिप्त, इंधन-स्नेही वाहन आहे - सीईओ वेंकटरामण मामील्लपले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल !!!!!

इमेज
रेनो ट्रायबरच्या नोंदणीला १७ ऑगस्टपासून सुरुवात,      अल्ट्रा मॉड्यूलर गेम चेंजर मानल्या जाणाऱ्या ट्रायबरचा २८ ऑगस्ट रोजी शुभारंभ !             नवी दिल्ली(प्रतिनिधी)::- रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून, त्यांनी त्यांचे नवीन उत्पादन रेनो ट्रायबरची नोंदणी खुली झाल्याची घोषणा केली आहे. २८ ऑगस्टपासून रेनो ट्रायबरचा बाजारात शुभारंभ होणार आहे. रेनो ट्रायबर ही भारत आणि फ्रान्समधील रेनो संघादरम्यान सामर्थ्य आणि सहकार्याचे प्रदर्शन करते. हे जगातील पहिले वाहन आहे, जे खासकरून भारतीय बाजारपेठेला समोर ठेवून  बनविण्यात आले. चेन्नई येथील निर्मिती सुविधा केंद्रात नवीन कारची निर्मिती याअगोदरच सुरू झाली आहे व देशातील रेनोच्या ३५० हून अधिक विक्रेत्यांकडे, सर्वात मोठ्या संपर्कजाळ्यापर्यंत वाहने लवकरच पोहोचतील.  रेनो ट्रायबरची नोंदणी १७ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. https://triber.renault.co.in या वेबसाईटवरून किंवा रेनोच्या अधिकृत विक्रेत्याकडे  रु.११०००/- टोकन रक्कम भरून ग्राहकांना रेनो ट्रायबरची नोंदणी करता येत आहे. “रेनो ग्रुपकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. भारतात विस्तार

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचे मानधन व अतिथ्य भत्त्यात वाढ करण्यात आली असल्याबाबत काल शासन निर्णय निर्गमित करण्यात आला !! सविस्तर माहितीसाठी शासन निर्णय पहावा , बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५, कलम ६१(१) मधील तरतूदीनुसार शासन वेळोवेळी निर्धारीत करेल, इतके मानधन व अतिथ्य भत्ता देय आहे. संदर्भात शासन निर्णयान्वये राज्यातील नगरपरिषदांमधील नगराध्यक्षांचे मानधन व अतिथ्य भत्ता निर्धारीत करण्यात आला होता. नगराध्यक्षांची जबाबदारी, कायमस्वरूप विचारात घेऊन, सदर मर्यादा वाढविण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. नगराध्यक्षांना मानधन व अतिथ्य भत्त्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णयानुसार मानधन व आतिथ्य भत्ता देय राहील. दरमहा जास्तीत जास्त मानधन व दरवर्षी जास्तीत जास्त अतिथ्य भत्ता खालीलप्रमाणे देण्यात येणार. (क्रमाने--नगरपरिषद/नगरपंचायत वर्ग, मानधन, आतिथ्य भत्ता ) अ वर्ग रू.25,000/.        रू 36,000/- ब वर्ग   रू.20,000/-       रू.24,000/- क वर्ग   रू.15,000/-.      रू.18,000/ याप्रमाणे मंजूरी देण्यात आली.

जायभावे कुटुंबाची लक्ष्मी तथा लक्ष्मीआई काळाच्या पडद्याआड !! लक्ष्मीआई , जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक जी. पी. खैरनार यांच्या लेखणीतून उतरलेली एक भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
जायभावे कुटुंबाची "लक्ष्मी" तथा "लक्ष्मीआई" पडद्या आड !          नाशिक::- शहरातील मोरवाडी येथील रहिवासी असलेले स्व. सुखदेव भावराव जायभावे यांच्या पत्नी गं. भा. लक्ष्मीबाई सुखदेव जायभावे यांचे मंगळवार दिनांक २०ऑगष्ट, २०१९ रोजी रात्री १०.४५ वाजता दुःखद निधन झाले. नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था , नाशिकचे सहचिटनीस अॅड. श्री. तानाजी जायभावे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदाम नागरे यांच्या गं. भा. लक्ष्मीबाई सुखदेव जायभावे या मातोश्री होत ! लक्ष्मीआई यांना सात मुले व एक मुलगी असा परिवार होता. लक्ष्मीआई यांचे माहेर नाशिक जवळील पिंपळगाव बाहुला येथील गामने कुटुंबातील. पिंपळगाव येथील गामने कुटुंब तसे सांप्रदायिक पंथाचे. त्यामुळे आई लक्ष्मीआई यांच्या संपूर्ण आयुष्यात सांप्रदायिक पंथाच्या निस्सीम भक्तीच्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कौटुंबिक जीवनात अनुभवास मिळाला आहे. आई लक्ष्मीआई यांचा पेहराव हा एखाद्या ऐटबाज स्त्रीचा होता. सडपातळ शरीरयष्टी, गोरा रंग, लांब नाक, अजाण बाहु व बोली शब्दात आद

१) वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात !! २) शाखा अभियंता निलंबित !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल www.newsmasala.in

इमेज
१) वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ! ************************ २) शाखा अभियंता निलंबित !        नासिक::- उप जिल्हा रुग्णालय मनमाड येथील वैद्यकीय अधिकारी व कक्ष सहाय्यक यांना आज लाचलुचपत विभागाने  लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.          तक्रादाराच्या बहिणीचे सिझेरीन करण्यात आले होते त्याबदल्यात ४०००/- रुपये लाच मागितली होती, तडजोडीअंती रुपये ३०००/-  स्विकारतांना उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील सुभाषराव पोतदार व उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील कक्ष सहाय्यक प्रविण निलकंठ राठोड या दोन्हीना पंच साक्षीदारांसमक्ष रुपये ३०००/- लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक यांनी रंगेहाथ पकडले. *****************************************     शाखा अ भियंता इंगळे निलं बित             नासिक::- गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर बोरपाडा रस्त्याच्या कामाचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला होता त्यानुसार आज जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग शाखा अभियंता इंगळे य

धर्म आणि राजकारणाच्या शुध्दीसोबत महिला सक्षमीकरण चळवळीत शांतीगीरीजींचे मोलाचे योगदान ! म्हाळसामाता ध्वजारोहण सोहळ्यात छ. संभाजीराजेंचे गौरवोद्गार !! रक्षाबंधनानिमित्त महिलांना वस्रदान व कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांना आर्थिक तसेच वस्तूरुपाने मदतीचा हात, जयबाबाजी परीवार व छावा क्रांतीवीर सेनेचा सामाजिक उपक्रम !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
धर्म आणि राजकारणाच्या शुध्दीसोबत महिला सक्षमीकरण चळवळीत  शांतीगीरीजींचे मोलाचे योगदान ! म्हाळसामाता ध्वजारोहण सोहळ्यात छ.संभाजीराजेंचे गौरवोद्गार            ओझर (प्रतिनिधी ) :- निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सर्वांगाने  प्रयत्न केले आहेत. आणि आजही अखंड सुरू आहे. त्यांच्या कार्याने मी प्रभावित झालो असून महिला सक्षमीकरणासाठी महाराजांचे मोठे योगदान आहे. अध्यात्मिक मार्गदर्शना बरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचे देखील कार्य ते करत आहेत, याचा मनस्वी आनंद व्यक्त करतांनाच छत्रपती घराण्यावर बाबाजींचा सदैव आशीर्वाद असावा असे विचार  छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार  छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.       निष्काम कर्मयोगी जागदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर समर्थ सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात दिनांक १९

खा. युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत, म्हाळसामाता पुण्यतिथी निमित्त जपानुष्ठाण व ध्वजारोहन सोहळा तसेच रक्षाबंधनानिमित्त महीलांना वस्रभेट कार्यक्रम ! ॐ जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रम ओझर (मिंग) येथे २२ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाला राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री ना. अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
म्हाळसामाता पुण्यतिथी व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन ! या कार्यक्रमाला महीलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन छावा क्रांतीवीर सेना नासिकच्या वतीने करण्यात आले आहे !            नासिक(२१)::-दि. २२ ऑगस्ट रोजी ॐ जगतगुरु जनार्दन स्वामी (मौनगिररीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी परमपूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व ओझर येथील पावन सानिध्यात, मातोश्री म्हाळसामाता पुण्यतिथी व रक्षाबंधना निमित्ताने महिलांना वस्रभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,  या कार्यक्रमसाठी खा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असून, दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री ना. अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली.         या प्रसंगी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना खा. स़भाजीराजे यांनी कठीण समयी मानसिक, सामाजिक व स्वता पूरस्थिती वर नजर ठेवून सर्वसमावेशक निर्णय घेतल्याचा व जनतेला धीर देण्याचे कार्य करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना मदत करण्य

महादेव जानकर धनगर समाजाला न्याय मिळवून देणार काय ? येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत राहणार काय ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महादेव जानकर धनगर समाजाला न्याय देणार का?             नागपूर (प्रतिनिधी)::-नुकताच पार पडलेल्या गीता कृष्ण महिला अर्बन क्रेडिट कोआॅप. सोसायटी नागपूर यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्ष भव्य कार्यकर्ता मेळावा, जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांना चा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना १००० स्कूल बॅग वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रमाचे आयोजन लोकेश रसाळ व सह आयोजक प्रा. सौ.माधुरी पालीवाल यांनी केले. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लाभलेले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , कॅबेनेट मंत्री, महादेव जानकर, राज्यमंत्री दर्जा प्राप्त शेळी व मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष बाळासाहेब दौडतले, खा. कृपाल तुमाने, आ,सुधाकर देशमुख, आ.मोहन मते, भाजपा महामंत्री राजाभाऊ पातकर, व भाजपचे ज्येष्ठ नेते, मान्यवर उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाला आरक्षण जर कोणी मिळवून देईल तर फक्त भाजप सरकार देईल असा विश्वास बावनकुळे  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिला.  महादेव जानकर यांनी धनगर समाज आरक्षण संदर्भात तसेच येत्या विधानसभा निवडणुकी मध्ये आपण भाजपशी यु

आयपीएल कंपनीचे वितरण व्यवस्थापक सचिन काकुस्ते व वितरण अधिकारी अनंत देवरे यांच्या कडून कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
         आयपीएल कंपनीचे वितरण व्यवस्थापक सचिन काकुस्ते व वितरण अधिकारी अनंत देवरे यांच्या कडून कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन !                                        टेंबे ता.शिरपूर::-सर्वच शेतकऱ्यांना शासनस्तरावरून प्रशिक्षण घेणे शक्य होईलच असे सांगता येत नाही मात्र अतिपावसामुळे जर कपाशीचे नुकसान झाल्यास प्रशासनावर खापर फोडायला सुरुवात होते, शासनस्तरावर शेतीशिवारांना भेटी न देणे, वेळच्या वेळी मार्गदर्शन न करणे, शासन व शेतकर्‍यांमध्ये समन्वयकांची भुमिका न घेणे असे आरोप परिसरातील शेतकरी कृषी विभागांवर करित असतात. यात तथ्य असेलच असे नाही, मात्र आजही शेतकऱ्यांमध्ये जागृती अभियान सतत राबविण्यात यायला हवे. याचा काही शेतीपूरक औषध निर्मात्या कंपन्यांकडून  प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात. असाच काहीसा कार्यक्रम टेंबे ता. शिरपूर जि. धुळे येथे. आयपीएल      कंपनीचे वितरण व्यवस्थापक सचिन काकुस्ते व वितरण अधिकारी अनंत देवरे यांनी राबविला. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अती पावसामुळे कपाशी पिकावर येऊ शकणारा रोग व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.             मार्गदर्शन क

आझाद मैदानावर उद्या आंदोलन ! निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आश्र्वासनपूर्ती करण्यात यावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
      नासिक::-महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक  संघटना (आयटक), महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने  "आशा" च्या प्रलंबित मागण्यासाठी दिनांक २० आॉगस्ट २०१९ मंगळवार पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन चे हत्यार उपसले आहे. अशी माहिती काॅम्रेड राजु देसले यांनी दिली. निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी आशा व गट प्रवर्तक मानधन वाढीचे दिलेले आश्वासन पूर्ण करा. आन्द्रप्रदेश सरकारने दरमहा १० हजार रुपये मानधन सुरु केले आहे, मात्र महाराष्ट्र सरकार १ रु हि देत नाही. याबाबत‌ राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक संलग्न सर्व आशा जिल्हा संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी केले आहे.              तसेच राज्य सरचिटणीस सुमन पुजारी, राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे, दिलीप उटाने, शंकर पुजारी, उपाध्यक्ष वैशाली खंदारे, अॅड. सुधीर टोकेकर, राज्य उपाध्यक्ष दिवाकर नागपुरे, शालुबाई कूथे, उपाध्यक्ष अमृत महाजन, मुगाजी बुरुड सुवर्णा मेटकर, माया घोलप, सुमन बागुल, सुरेखा खैरनार अर्चना गडाख, सुनीता गांगुर्डे, विजय दराडे आदींनी

एचबीएन गुंतवणूकदारांना लवकरच परतावा मिळणार-गणेश नरेडी ! देशभरात एचबीएन चे लाखो गुंतवणूकदार !! जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये एचबीएन मध्ये !!! केबीसी, इमू, समृद्धी जीवन, संजीवनी, मैत्रेय सारख्या अनेक कंपन्यां येऊन गेल्यात व गुंतवणूकदारांच्या संकल्पसिद्धिस बेचिराख करून गेल्यात तरीही गुंतवणूक दारांचा हव्यास संपत नाही !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
एचबीएन गुंतवणूकदारांना लवकरच परतावा मिळणार-गणेश नरेडी !                   संकल्पसिद्धि लवकर व्हावी अशी आशा बाळगून अनेक गुंतवणूकदार आपल्या घामाचा, कष्टाचा पैसा अमीषापोटी कंपन्यांमध्ये, नेटवर्कर च्या माध्यमातून गुंतवतात व थोड्याच कालावधीत कंपनी फरार होते, होते नव्हते ते सारे संपुष्टात येते तरीही सर्वसामान्य माणूस पुन्हा पुन्हा आमीष मार्गांवर का जात राहतो ? हा प्रश्र्न जर प्रत्येक वेळी स्वताला विचारला तर अशी वेळ अनेकांवर येणार नाही ! एचबीएन गुंतवणूक दारांचे पैशांचा परतावा मिळावा व कुटुंब सुखासमाधानात रहावे या शुभेच्छांसह !                          -- संपादक,            नासिक (१८) ::- आॅल एचबीएन इनव्हेस्टर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश नरेडी , ट्रस्टी संतोष निर्मलकांत, एन.डी.साहू, राजू दोडके, नासिकचे श्रीराम चित्ते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की नॅशनल लाॅ  ट्रिब्युनल यांचे मार्फत लवकरच एचबीएन गुंतवणूकदारांना परतावा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.           संस्थेच्या वतीने मा. नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्युनल मध्ये दावा दाखल केला होता त्याचा निकाल देताना १४ आॅगस्ट २०१९ रोजी एच

महाराष्ट्रातील पूर परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा-अण्णासाहेब कटारे! ईव्हिएम हटाव मोर्चात होणार सहभागी !! पत्रकार परिषदेच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्रातील पुर परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा-अण्णासाहेब कटारे! शुक्रवार दि.१६ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला धरले धारेवर! मुंबई(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्र अगोदरच दुष्काळाने होरपळत होता. पर्जन्यमान समाधानकारक होईल असे वेधशाळेचे अंदाज होते, सुरुवातीपासूनच पाऊस बऱ्यापैकी झालाही परंतु मागील १० ते १५ दिवसांचा पाऊस हा तर भयंकर उग्र स्वरूप घेऊन आला, ह्या अतिपावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे बाधित झाले परंतु सांगली, सातारा, कोल्हापूरला मात्र याचा सर्वाधिक फटका बसला व अनेक लोकांचे प्राण गेले, जनावरे दगावली, घरे-दारे, शेती वाहून गेली, भयंकर परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीपासून ह्या सरकारने पूरपरिस्थिती कडे कानाडोळा करून आपली महाजनादेश यात्रा सुरू ठेवली, पूरग्रस्त मदतीची याचना करीत असतांना सरकारने त्वरित कुठलीही उपाय योजना केली नाही. यात नियोजनाच

शेती हा विषय आत्मसन्मान मिळण्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव निर्माते आनंद पगारे यांनी करून दिली !! कृषी कन्या नंतर सपन सरलही यशस्वी होईल- प्रा. डॉ. शंकर बोराडे !! आनंद पगारेंच्या जिद्दीला सलाम ची सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आनंद पगारे यांच्या  जिद्दीला सलाम- प्रा. डॉ. शंकर बोराडे          नाशिक: आनंद पगारे मालेगाव तालुक्यातून लहानशा गावातून येऊन स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. 'कृषी कन्या' ह्या लघुचित्रपटास महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रथम क्रमांक मिळाला. याची निर्मिती आनंद पगारे यांनी करून शेती हा विषय आत्मसन्मान मिळण्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली आहे. कठोर परिश्रम व जिद्दीतून पगारे काम करत आहेत त्यांच्या कार्याला सलाम आहे . ते निर्मिती करत असलेल्या "सपन सरल" हा शेतकरी विषयावरील चित्रपट हि  महाराष्ट्रात यशस्वी होईल यासाठी साहित्यिक प्रा. डॉ. शंकर बोराडे यांनी आनंद पगारे यांच्या सत्काराप्रसंगी मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले शाल, स्मृती चिन्ह वृक्ष रोप देऊन सत्कार केला व चित्रपट यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.           कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय व महर्षी चित्रपट संस्था नाशिक यांच्या वतीने १२ आगस्ट २०१९ रोजी सुर्वे वाचनालयात आनंद पगारे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यांचा "कृषी कन्या" ह्या लघुचित्रपटास महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांक मिळ