ब्रेकींग,,. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेतील सविस्तर मुद्दे !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगलीतील पत्रपरिषदेतील सविस्तर मुद्दे
- यंदाचा पाऊस अतिशय प्रचंड झालेला आहे. सांगलीत २००५ ला पूर आला, तेव्हा ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस, २०१९ मध्ये ९ दिवसांत ७५८ टक्के पाऊस.
- कोल्हापूरचा पाऊस २००५ मध्ये ३१ दिवसांत १५९ टक्के, तर २०१९ मध्ये ९ दिवसांत ४८० टक्के
- कोयनामध्ये १०० टीएमसी पाणी असतं, ९ दिवसांत ५० टीएमसी पाणी भरले गेले आहे. त्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला.
- कृष्णा, पंचगंगा, कोयना अशा एकत्रित विसर्गामुळे ही परिस्थिती
- ओरिसा, पंजाब, गुजरात, गोवा अशा अनेक राज्यातून टीम बोलावल्या. आज नौदलाच्या १५ चमू विशाखापट्टणम येथून येत आहेत.
- केंद्र सरकारची पूर्ण मदत मिळते आहे. जितक्या टीम मागितल्या जात आहेत, तितक्या टीम्स प्राप्त होत आहेत.
- सांगलीत सुमारे ९५ बोटी कार्यरत.
- सांगलीत १०१ गावांतील २८५३७ कुटुंब विस्थापित
- ३५ हजार जनावरं सुद्धा विविध शिबिरांमध्ये
- ब्रम्हनाळच्या घटनेत १२ जणांचा मृत्यू, ८ बेपत्ता, २ जखमी.
- याव्यतिरिक्त कुठेही जिवितहानीचे वृत्त नाही.
- नजरपाहणीनुसार, २७४६८ हेक्टर जमीन बाधित. पाणी ओसरल्यावर नेमकी माहिती हाती येईल.
- ४८४ कि.मीचे रस्ते बाधित
- २६१५ रोहित्र अंशत: वा पूर्णत: नुकसान, कमतरता नाही. कमीत कमी वेळात पूर्ववत करणार
- ७ टन अन्नधान्य, पाणी कालपर्यंत पोहोचविण्यात आले. आता बोटीने सुद्धा अन्नधान्य पोहोचविण्यात येत आहे.
- काही लोक बाहेर निघायला तयार नाहीत, त्यांनाही विनंती करण्यात येत आहे.
- कोल्हापूर आणि सांगली मिळून ३,७८,००० लोकांना बाहेर काढले. दोन जिल्हे मिळून ३०६ छावण्यांमध्ये निवारा
- २५०० ते ५००० रूपये अशी मदत पूर्वी दिली जायची, आता १० हजार ते १५ हजार रूपये मदत देण्यात येत आहे.
- ज्यांना रोखीने मदत देण्याची गरज आहे, त्यांना रोखीने मदत देण्याचा निर्णय कालच घेण्यात आला असून, तसे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. रोखीने मदत दिल्यास कॅग आक्षेप घेते. पण, अशा प्रसंगात कॅगचे आक्षेप सुद्धा सहन केले पाहिजे.
- मृतांना पूर्वी दीड लाखांची मदत दिली जायची, ती आता 5 लाख रूपये करण्यात आली आहे.
- अपंगत्त्व आल्यास पूर्वी ४३ हजार रूपये मदत दिली जायची, ती आता २ लाख रूपये करण्यात आली आहे. उपचारासाठी सुद्धा आर्थिक मदत दिली जात आहे.
- घर पडले तर पूर्वी ६० हजार रूपये दिले जायचे, ते आता १ लाख रूपये करण्यात आले आहे.
- जनावरांचे नुकसान : ३० हजार रूपये मदत
- दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी १०० डॉक्टरांच्या चमू तैनात करण्यात आल्या आहेत.
- सफाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
- शेतीतील गाळ काढण्यासाठी १३००० रूपये हेक्टरी मदत, खरडून गेलेल्या जमीनीसाठी ३८००० रूपये मदत
- उद्योगांचे नुकसान झाले, तेथेही मदत करण्याचा निर्णय
- पाणीपुरवठा योजना, वीज इत्यादींची दुरूस्तीला अग्रक्रम देण्यात आला आहे.
- आर्ट ऑफ लिव्हींग, पंढरपूर देवस्थान, सिद्धीविनायक अशा अनेक संस्था आर्थिक मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
- माझे सर्वांना आवाहन आहे की, कृपया घाबरून जाऊ नका, घाबरण्यासारखे काहीही नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
- कर्नाटकमधून पाण्याचा विसर्ग सुद्धा होतो आहे. आपात स्थितीचे राजकारण कुणी करू नये, हे माझे विनम्र आवाहन आहे. विरोधकांनी काही चूक होत असेल, तर जरूर दाखवावे, आम्ही ती दुरूस्त करू. पण, आज एकत्रितपणे सर्वांनी मदतीसाठी उभे राहण्याची गरज आहे.
स्रोत-न्यूज मसाला पत्रकार मित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!