धनगर ऐक्य अभियान -- धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे ! १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य..
धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे
१३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय वरती धनगर समाज बांधव धनगर ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्व:ताच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे
    .....निवेदन मधील विषय....
धनगर समाज STआरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा !
धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा व 1000 कोटीची तरतूद ताबडतोब करा.
मेंढपाळांना संरक्षण द्या त्याच्यावर होणारे हाल्ले थांबवा.
यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून मे. तहसीलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे, यामध्ये सरकारला पंधरा दिवसाचा वेळही ही दिला जाणार आहे.
अन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर महा विकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषित करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी जाहीर केले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक — डॉ. पंकज भट