लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !


लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !
        
      संभाजीनगर (प्रतिनिधी)::- प्रसिद्ध लेखक कै. सुहास शिरवळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित कादंबरी लेखन स्पर्धेत लेखक रवींद्र भयवाल लिखित "मिशन गोल्डन कॅट्स" या कादंबरीची निवड परीक्षकांनी 'विजेती कादंबरी' म्हणून केली आहे. या कादंबरी लेखन स्पर्धेत एकूण एकवीस लेखक सहभागी झाले होते.

रवींद्र भयवाल यांच्या या यशामुळे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
               रवींद्र भयवाल यांची आतापर्यंत साहित्यातील विविध प्रकारात एकूण सहा पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
           रवींद्र भयवाल हे छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांचे सुपुत्र असून चेन्नई येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत विभागप्रमुख आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!