३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

         मुंबई -नासिक::- “३५० वा शिवराज्याशिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचे पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धित शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा वापर करण्याचा शासन निर्णय राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात आला.

          बोधचिन्हाचा सर्व शासकीय पत्रव्यवहारात, प्रचार- प्रसिद्धित कटाक्षाने वापर करण्यात यावा. शासकीय कार्यालयात दर्शनी भागात बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे अशा सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!