३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

         मुंबई -नासिक::- “३५० वा शिवराज्याशिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचे पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धित शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा वापर करण्याचा शासन निर्णय राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात आला.

          बोधचिन्हाचा सर्व शासकीय पत्रव्यवहारात, प्रचार- प्रसिद्धित कटाक्षाने वापर करण्यात यावा. शासकीय कार्यालयात दर्शनी भागात बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे अशा सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!