विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे.. डॉ. दिलीप कोठावदे यांनी लिहिलेला भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा याविषयी परखडपणे मांडलेले विचार आज समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत, यांत मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय भरला जातोय याची जाणीव आता नवविवाहित वधू-वरांनी तसेच त्यांच्या आई-वडिलांनी ठेवणे काळाची गरज आहे. भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ सामाजिक कार्यक्रम नाही; तो एक संस्कार आहे. दोन व्यक्ती, दोन कुटुंबे, दोन परंपरा आणि दोन आयुष्ये एकमेकांशी जोडण्याचा तो पवित्र क्षण मानला गेला आहे. पूर्वी लग्न म्हणजे घराघरांतला आनंद, नात्यांतील ऊब, आपुलकीचा सहवास आणि साधेपणातला समाधानाचा सोहळा असायचा. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. विवाह हा संस्कार कमी आणि दिखाऊपणा, प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा आणि सामाजिक बाजारपेठ यांचे प्रदर्शन अधिक बनला आहे. आजचा विवाहसोहळा पाहिला की प्रश्न पडतो — लोक लग्न करत आहेत की एखादा चित्रपट शूट करत आहेत ? हजारो लोकांची गर्दी, लाखो रुपयांची सजावट, डीजेचा कर्णकर्कश आवाज, सोशल मीडियासाठी बनवलेले कृत्रिम हावभाव,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा