सामाजिक न्याय पर्व अंतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता व जात प्रमाणपत्रांचे वाटप !

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता व जात प्रमाणपत्रांचे वाटप !

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत नाशिक जिल्हयातील ३६६२  विद्यार्थाना जात वैधता व ५६९७ जात प्रमाणपत्रांचे वाटप !

         नाशिक::- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक १एप्रिल २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या महिनाभराच्या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व"  हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक, सुनिल वारे यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या या कालावधीत राबविण्यात आलेल्य मोहिमेत जिल्हातील ९ हजाराहुन अधिक विद्यार्थाना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.



            या विशेष मोहिमेमध्ये नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून ३६६२ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात आलेले आहेत व नाशिक जिल्हयातून सर्व उपविभागीय अधिकारी यांचेकडून ५६९७ जात दाखले निर्गमित करण्यात आलेले आहेत.
प्रकरण जमा करण्याचे आवाहन !
ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रीकी, वैदयकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फॉर्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे, व त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणी चे अर्ज ऑनलाईन भरलेले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मुळ कागदपत्र अपलोड करुन व ते अर्ज सर्व अपलोड केलेल्या मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह व मुळ शपथपत्रांसह (Hard Copy) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकच्या " नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत स्वतः किंवा वडिल / भाऊ /बहिण / आई यांनी जमा करावेत. जेणेकरुन त्यांचे प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येतील.

 दलालापासुन सावध राहण्याचे आवाहन !
अर्जदारानी अर्ज भरतांना स्वतःचा ईमेल व मोबाईल क्रमांकाव्दारेच अर्ज नोंदणी करावा, सर्व मुळ कागदपत्र अपलोड करण्यात यावीत व आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करुन ठेवण्यात यावा, समितीने त्यांचे प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय/जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेल वर प्राप्त होत असते. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तींच्या अमिशास बळी पडू नये, अशा त्रयस्त व्यक्तीकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज स्वतः व्यवस्थित रित्या परिपूर्ण सादर करावे अन्य कोणत्याही कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क करू नये असेही आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।