९८ व्या नाट्य संमेलनातील एक परिसंवाद " सांस्कृतिक आबादुबी " !! सविस्तर वृत्तांतासाठी खालील लिंकवर क्लिक करा ,,,,

दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी 

मुंबई::-९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंडला मोठ्या उत्साहाने साजरे झालेयामध्ये विविध कार्यक्रमाची रेलचेल होतीरसिक प्रेक्षकांनी सर्वच कार्यक्रमाचा आस्वाद मनमुरादपणे अनुभवलाया संमेलनात सांस्कृतिक आबादुबी हा परिसंवाद डॉ हेमू अधिकारी रंगमंच ह्या ठिकाणी आयोजित केला होताह्या मध्ये डॉ जब्बार पटेलप्रतिमा कुलकर्णी,पुरुषोत्तम बेर्डेअद्वैत दादरकरप्रियदर्शन जाधवचिन्मय मांडलेकरदेवेंद्र पेम,प्राजक्त देशमुखसंतोष पवारप्रताप फड,केदार शिंदेयांचा सहभाग होता या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र जोशी ऋषिकेश जोशी यांनी केलं होतेत्यांनी कलाकार दिगदर्शक यांना विविध प्रश्न विचारून बोलते केलं आणि हळूहळू हा सांस्कृतिक आबादुबी चा परिसंवाद रंगायला सुरवात झालीया मध्ये डॉ जब्बार पटेल म्हणालेमला जी नाटके पटतात ते मी करतोह्यावेळी त्यांनी घाशीराम कोतवाल विषयीच्या आठवणी सांगितल्याआणि आता एखादे नाटक करण्याचा विचार आहे असेहि ते म्हणाले.देवेंद्र पेम म्हणाले कि मला विनोदी नाटके करण्याची आवड होती त्यामुळे अधिकाधिक विनोदी नाटके केली त्याच्या तालमी गिरगावमध्ये जिथे आम्ही राहत होतो त्याठिकाणी तेथील बिल्डिंगच्या गच्चीवर केलानाटकाचा विषय हा विनोदी अंगाने मांडला गेला कि तो प्रेक्षकांना अधिक रुचतोकेदार शिंदे यांनी आपल्या आजोबांचे अर्थात शाहीर साबळे यांचे उदाहरण देऊन सांगितले कि मला विनोदी नाटके करायला आवडतात त्यामुळे विनोदी नाटके सादर केली त्यामुळे गंभीर निर्माते हे हसायला लागलेहे नाटकाचे यश आहेसंतोष पवार म्हणाला आम्हाला विचारता कि विनोदी नाटके का करता पण गंभीर नाटके करणाऱ्यांना विचारा कि तुम्ही विनोदी नाटके का करीत नाहीप्रतिमा कुलकर्णी म्हणते कि प्रेक्षकांनी नाटक जर गांभीर्याने घ्यायला हवे असेल तर कलाकार मंडळींनी आपले काम गंभीरपणे सादर करायला हवे.प्रियदर्शन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं किनाटक हे नटाचे माध्यम आहेलेखकांनी लिहिलेलं नाटक दिगदर्शकानी बसवलं कि त्यानंतर ते नाटक एकदा पडदा उघडला कि ते नाटक फक्त नटाचं होऊन जातं मी मला नाटक भावलं तस नाटक केलंगंभीर विनोदी नाटक असे वेगळेपण केलं नाहीहे सांगताना ते म्हणाले कि आपलीच माणसे आपलं नाटक पाहायला येत नाहीत.पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपले अनुभव सांगितल्यावरते म्हणाले किमी टूरटूर ह्या नाटकानंतर एक नाटक केलं त्यामध्ये नामवंत कलाकार होतेसंगीत नेपथ्य सर्वच उत्तम होतंपण ते नाटक चाललं नाहीप्रेक्षकांची मानसिकता आपण जाणून घ्यायला पाहिजेनाटकाचे व्यवस्थापन मार्केटिंग करणे हे गरजेचं आहेचिन्मय मांडलेकर म्हणाला मी फक्त व्यावसायिक नाटक करणार,, त्या नाटकांनी जो कोणी निर्माता असेल त्याला पैसे परत मिळवून दिले पाहिजेतअद्वैत दादरकर म्हणालाआपण एक चांगलं नाटक करूयानाटक समकालीन वाटलं पाहिजेनाटकाचे कास्टिंग हे निर्माता करतोत्यांना जे जे हवे ते कलाकार घेतात त्यांच्या पसंतीचे घेतलेल्या कलाकारांना घेऊन नाटक करावे लागतेनाटकाचे कास्टिंग जर व्यवस्थित झाले नाही तर नाटकावर परिणाम होतोप्राजक्त देशमुख यांनी देवबाभळीच्या आठवणी सांगितल्या आणि म्हणाले कि मला फक्त केवळ नाटकच करायचं होते ते कोणत्या पठडीतलं आहे असा शिक्का लावलेला नव्हताअभिवाचन करून नाटकांचे स्वरूप कळतेयापुढे मला चांगली गोष्ट असणारी नाटके करायची आहेतप्रताप फड म्हणालेमी व्यावसायिक नाटकाच्या गणिताच्या ताळमेळात अडकलो होतो,आम्हाला काहीच कळत नाही असे अनेकांना वाटत असतेवडिलांच्या कडून एक चांगला सल्ला मिळाला होता ते म्हणाले कि जे करशील ते मनापासून कर,अनन्याच्या एकांकिके नंतर मला निर्माते मोहन वाघ यांच्या कडून ऑफर आली होती पण त्यावेळी योग आला नाही.

असा हा सांस्कृतिक आबादुबी चा परिसंवाद झाला पण काही प्रमाणात रंगला काही प्रमाणात प्रेक्षकांची पकड घेऊ शकला नाही,,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !