शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालखी सोहळा नियोजन समन्वय समिती स्थापन करा-संजय धोंडगे, अध्यक्ष , संतश्रेष्ठ निव्रुत्तीनाथ समाधी संस्थान !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी समन्वय समिती स्थापन करा : संजयनाना धोंडगे
पंढरपूर दि २० - महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या संतांच्या  पालखी सोहळ्यांना विज , पाणी , रस्ते , आरोग्य , रॉकेल , गॅस , दर्शन  पास , सुरक्षा या व अशा अनेक अडीअडचणीना  तोंड द्यावे लागते . त्या अडचणी   निवारण करण्यासाठी तसेच या  प्रमुख पालखी सोहळ्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  राज्यातील प्रमुख सात पालखी सोहळ्यांची समन्वय समिती स्थापन करावी अशी मागणी  श्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष ह भ प संजयनाना धोंडगे यांनी केली .
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या संत तुकाराम भवन मध्ये राज्यातील सहा पालखी सोहळा प्रमुखांची बैठक पार पडली . या बैठकीस श्री विठठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य  ह भ प शिवाजी महाराज मोरे ,राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे ,  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे , संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प बाळासाहेब मोरे , संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प संजयनाना धोंडगे , सचिव पवनकुमार भुतडा , संत सोपानकाका पालखी सोहळा प्रमुख श्रीकांत चिंतामणी , प्रमुख विश्वस्थ गोपाळ गोसावी ,संत मुक्ताबाई संस्थानचे व्यवस्थापक शशिकांत पाटील यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते .
संजयनाना धोंडगे म्हणाले संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे मोठे असल्याने त्यांच्याकडे शासनाचे लक्ष असते . परंतु इतर पालखी सोहळ्यातही दिंड्यांची संख्या वाढली आहे . लाखोचा जनसमुदाय या सोहळ्यांबरोबर चालत असतो . त्यांना शासन सुविधा देणार की नाही . संत निवृत्तीनाथांचा सोहळा नाशिक , नगर व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो . या तीन जिल्हा प्रमुखांची बैठक घेवून या पालखी सोहळ्याला सुविधा देण्यास सांगणे गरजेचे आहे . संत मुक्ताई व संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याना इतर सुविधा तर सोडाच  साधे पाण्याचे टॅंकरही मिळत नाहीत . महाराष्ट्र शासनाने या पालखी सोहळ्यांकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले .
संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे प्रमुख श्रीकांत गोसावी म्हणाले , शासन संतामध्ये भेद करीत आहे . सोपानदेवांचा सोहळा आता सव्वालाखापर्यंत पोहचला आहे . या सोहळ्याला शासनाने सुविधा द्यावी .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!