रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र पाठांतर स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी होणार !

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र पाठांतर स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी होणार !

  नासिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::-  वेद, पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे आणि महाकाव्यांनी समृध्द असलेल्या भारतीय संस्कृतीची परंपरा महान आहे. आपल्या मराठी मनांसाठी मारुती स्तोत्र, रामरक्षा आणि मनाचे श्लोक हि स्तोत्रे लहानपणापासूनच संस्कार करणारी आहेत. शारीरिक व्यायामा बरोबरच मनाचा व्यायाम व्हावा म्हणून पुरातन काळापासून हि स्तोत्रे घरोघर म्हटली जात होती. आजही काही घरांमध्ये या स्तोत्रांचे पठाण होत आहे. परंतु आपल्या लहानग्यांना या स्तोत्राची गोडी लागावी तसेच त्यांनी ते सातत्याने म्हणत रहावे यासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्यावतीने नाशिक शहरातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मारुती स्तोत्र आणि इयता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी  सकाळी ९.०० ते १२.३० यावेळेत होणार असून जवळपास ५५० शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धा काळाराम मंदिर आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अभ्यंकर सभागृह अशा दोन्ही ठिकाणी होणार आहेत. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. मोरे साहेब, विश्वस्त महंत सुधीरदास पुजारी, धनंजय पुजारी, तसेच शंतनु गुणे, संजय मोडक यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

       यावेळी सर्व समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी कार्यवाह सुभाष सबनीस आणि सर्व कार्यकारी मंडळाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास.". निशा डांगे यांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मविश्वास बाबत सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !