काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन ! "कवितेमुळे भारत-नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम

काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन !
"कवितेमुळे भारत नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम

जागतिक मातृभाषा दिनानिमित्त नेपाळ येथे आयोजित बहुभाषिक विश्व साहित्य संमेलनातून !

    काठमांडू (न्यूज मसाला वृत्तसेवा)::- अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनाच्या सहअध्यक्ष म्हणून नांदेडच्या साहित्यिक डॉ.ज्योती कदम या  आमंत्रित होत्या. बहुभाषिय संमेलनामुळे नेपाळ- भारत मैत्रीचे धागे अधिक घट्ट होतील असा विश्वास डॉ.ज्योती कदम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
 डॉ.ज्योती कदम  यांच्या "आदिम जाणीव" या कवितेने उपस्थित रसिक - श्रोते यांना मंत्रमुग्ध करीत रसिकांची दाद मिळवली.

      भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि . सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ -भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले .

त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली, अवधी, संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, व इंग्रजी अशा  भाषेतील तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
        राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन काठमांडू येथे संपन्न झाले. भारतीय दूतावासातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आसावरी बापट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक 
 केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून  भूपाल राई, कुलपती, नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान,  बिमल कृष्ण श्रेष्ठ, उप कुलपती नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान व डाॅ. गंगाप्रसाद अकेला, ज्येष्ठ साहित्यिक हे लाभले होते. अध्यक्षस्थान त्रिभुवन विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख डाॅ. संजीता वर्मा यांनी भूषविले. नेपाळचे राजदूत श्रीवास्तव  या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. यावेळी काशिनाथ न्यौपाने हिंदी विभाग त्रिभुवन विश्वविद्यालय, गिरीश चंद्र लाल, नेपाळ उच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश, प्रोफेसर माधव प्रसाद पोखरेल, नेपाळ प्रतिष्ठित भाषातज्ञ उपस्थित होते. सह अध्यक्षा म्हणून २४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ज्योती कदम  या उपस्थित होत्या . 
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी पाठवलेला शुभसंदेश सर्व रसिकांना चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. भाषेचे राष्ट्राच्या प्रगतीत खूप मोठे योगदान असते. भारत व नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सर्व साहित्यिक प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
         या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दहा कवी व कवयित्री यांची निवड करण्यात आली होती .
प्रत्येक भाषेतील कवी कवयित्रींनी आपापल्या दर्जेदार कविता यावेळी सादर केल्या. वेगवेगळ्या बारा भाषेतील साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदविल्याने इतर भाषेतील विचारांची आधार प्रदान यावेळी चांगल्या प्रकारे झाली. यावेळी
त्रिभुवन विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठातील कुलपतींनी मराठी साहित्यिकांना विद्यापीठांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. भारतीय भाषेतील कवितांचा अनुवाद इतर भाषेमध्ये करणारी मंडळी या संमेलनातून पुढे आली. मराठी भाषेतील उत्कृष्ट कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. नेपाळचे माजी राजदूत ठाकूर यांनी भारतीय साहित्यिकांना चहापानासाठी निमंत्रित केले.
         या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राजदूतावास नेपाळ आणि अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे माजी राजदूत व डॉ. आसावरी बापट यांनी परिश्रम घेतले .
         या संमेलनामुळे भारत नेपाळ मैत्रीचा पूल बांधण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास दोन्ही देशातील साहित्यिकांनी व्यक्त केला. या संमेलनातील सर्वच कवी हे प्रतिथयश मान्यवर कवी असल्याने हे साहित्य संमेलन अधिक समृद्ध झाले. यावेळी त्रिभुवन विश्वविद्यालय, वाल्मिकी विद्यापीठ, नेपाळ संस्कृत विश्व विद्यालय, अक्षरयात्री प्रतिष्ठान भारत, स्वामी विवेकानंद संस्था नेपाळ, राजदूतावास नेपाळ
यांचे प्रतिनिधी उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!