शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन !


शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन
!

अहमदनगर(प्रतिनिधी)::- “१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, लेखसंग्रह, कादंबरी, बालवाड्मय, संशोधन ग्रंथ, समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.
             वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी “ पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
          सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती, परिचय, पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे ३१ मार्च २०२२  पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००१ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, किशोर डोंगरे, प्रा.अशोक कानडे, शर्मिला गोसावी, सुनील गोसावी, राजेंद्र फंड  यांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग,,,,,,,,,, भाग २- लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर